जिल्हाFebruary 14, 2026
जिल्हा

नांदेडमध्ये १५ फेब्रुवारीला आठवे अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलन; दिवसभर भरगच्च साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रम.

लेखक : Gajanan Gangadhar Bidkar   |  February 14, 2026

 

नांदेड प्रतिनिधी दि.१४ :-  येत्या रविवार दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी नांदेड येथे आठवे अखिल भारतीय एक दिवसीय भव्य गुरु रविदास साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असून त्याची जय्यत तयारी करण्यात येत असल्याची माहिती या संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रवीण जेठेवाड तथा मुख्य प्रवर्तक इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी दिली.

 

 

 

 

शिवपार्वती मंगल कार्यालय भावसार चौक नांदेड येथील संमेलन स्थळास महान क्रांतिकारी बिरसा मुंडा यांचे नाव देण्यात आले असून येथे रविवारी दिवसभर भरगच्च साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात ग्रंथयात्रा, ध्वजारोहण, उदघाटन सत्र, परिसंवाद, कथाकथन, सांस्कृतिक कार्यक्रम, गीत, संगीत, नृत्य, भारुड, एकपात्री नाट्यप्रयोग, कविसंमेलन व समारोप कार्यक्रमाचा समावेश आहे.

 

 

 

 

या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी अकोला येथील सुप्रसिद्ध साहित्यिक लेखिका प्रा. डॉ. सौ. निर्मला पुंडलिक भामोदे ह्या राहणार असून नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप साहेब यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन सकाळी १०:३० वाजता होणार आहे. तत्पूर्वी सकाळी ९ वाजता गुरु रविदास चौक, तरोडा नाका नांदेड येथून ग्रंथयात्रा निघणार असून अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष बालाजीराव जमदाडे (परभणी) यांच्या हस्ते ग्रंथयात्रेचे उद्घाटन होणार आहे.

 

 

 

 

 

या ग्रंथयात्रेचे संमेलन स्थळी आगमन झाल्यानंतर सकाळी ९:३० वाजता अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे तेलंगणा प्रदेशाध्यक्ष राजेश खंदारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. यावेळी अल्पोपहारानंतर सकाळी १०:३० वाजता दीप प्रज्वलन आणि संविधान प्रास्ताविका वाचनानंतर उद्घाटन होणार आहे. यावेळी गुरुद्वारा लंगर साहिबचे प्रमुख स. बाबा बालविंदरसिंग यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

 

 

 

 

हदगाव येथील सहाव्या अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष सुभाष सोनवणे (अहिल्यानगर), चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर (अहिल्यानगर), सुप्रसिद्ध विचारवंत व सदस्य, जमाते इस्लामी हिंद, संत साहित्य अभ्यासक डॉ. रफिक पारनेरकर (अहिल्यानगर), लोकस्वराज आंदोलनाचे संस्थापक प्रा. डॉ. रामचंद भरांडे (नांदेड), सिने कलाकार मुरली मनोहर टी. (हैदराबाद) आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव बापुराव गजभारे यांची यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहणार आहे.

 

 

 

महावितरणचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता रामदास कांबळे, पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, संतोष तांबे, बाळासाहेब रोकडे, महापारेषणचे कार्यकारी अभियंता आफताब खान, माजी जि. प. सदस्य साहेबराव धनगे, सामाजिक कार्यकर्ते जगदीश बेदवे (सिल्लोड), ॲड. दिलीप वाळंज (अंबरनाथ), बसपाचे प्रदेश सचिव दिगंबर मोरे, बामसेफचे मराठवाडा प्रमुख मिलिंद बनसोडे, राम गायकवाड (बीड), बाबुराव वाघमारे (येरोळ), गणेश गायकवाड (उदगीर), बिरसा मुंडा जयंती उत्सव समितीचे नांदेड जिल्हाध्यक्ष राजेश्वर पालेपवाड, गणेश कांबळे (लातूर रोड), ॲड. शिवराज कोळीकर (नांदेड), कामगार नेते गौतम भद्रे, जमात ए इस्लामी हिंद नांदेडचे आबेद खान पठाण यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

 

 

 

छ. संभाजीनगरचे सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त बालाजीराव सोनटक्के हे वाळूज जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल त्यांचा या साहित्य संमेलनात सत्कार करण्यात येणार आहे तसेच सुरज ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष रमेश पारसेवार यांना जीवन गौरव, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व्यंकटराव दुधंबे यांना समाजभूषण तर योगेश छबिलवाड (छ. संभाजीनगर) यांना बिरसा मुंडा युवा क्रांती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

 

 

 

 

यावेळी विजयकुमार कदम (मुंबई) लिखित “लॉकडाऊनमधील प्रेम” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. शेवटी संमेलनाध्यक्षा प्रा. डॉ. निर्मला भामोदे यांचे भाषण होणार आहे. यावेळी बालाजी फुलपगार आणि पत्रकार रमेश गंगासागरे (भोकर) हे संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करतील. कुसुम गणेश गायकवाड (नांदेड) ह्या स्वागतगीत सादर करतील तर इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांचे प्रास्ताविक होईल. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मीनाक्षी नारायण वाघमारे तर शेवटी आभार प्रदर्शन प्रियंका विपुल देगलूरकर ह्या करतील.

 

 

 

बेगमपूर राज्याची संकल्पना

पाचव्या सत्रात दुपारी बारा वाजता “बेगमपूर राज्याची संकल्पना व भारतीय संविधान” या विषयावर परिसंवाद होणार असून अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराव लकवाले (उदगीर) हे या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी राहतील. राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड (नांदेड), विचारवंत बालाजीराव साबळे (लातूर) आणि महिला सामाजिक कार्यकर्त्या सौ. मंगल रमेश दुधम्बे हे विषयावर आपले विचार मांडतील. यावेळी शाहिर प्रदीप कडबे (रामटेक) आणि तुकाराम जाधव (कोरपना) हे क्रांतिगीते सादर करतील. याचे सूत्रसंचलन माया कर्नाडे (जालना) आणि आभार प्रदर्शन अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे जालना जिल्हाध्यक्ष गणेश शिंदे हे करतील.

 

 

 

 

सहाव्या सत्रात दुपारी दीड वाजता एकपात्री प्रयोग “मी रमाई बोलतेय !” गायत्री रामटेके (बल्लारशा) ह्या सादर करतील. याचे सूत्रसंचलन राहुल खंदारे (उमरी) हे करतील तर आभार प्रदर्शन सौ. विद्या अरुण उकंडे (नांदेड) ह्या करतील. सातव्या सत्रात दुपारी दोन वाजता भोजन अवकाश जाहिर करण्यात आला आहे. महाशिवरात्री निमित्ताने उपवासाच्या फराळाची व सुरुची भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

 

 

 

 

 

दुपारी अडीच वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. त्यात कु. शिपा मंगेश पवार (भद्रावती) ह्या संगीत नृत्य सादर करतील तर सौ. वंदना संभाजी वाघमारे (बिटरगाव ता. उमरखेड) ह्या सामाजिक आशयाचे भारुड आणि बुरगुंडा सादर करतील. या आठव्या सत्राचे सूत्रसंचलन अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे नांदेड जिल्हाध्यक्ष गंगाधर गंगासागरे हे करतील तर जिल्हा महासचिव प्रकाश कामळजकर हे आभार प्रदर्शन करणार आहेत.

 

 

 

 

नवव्या सत्रात दुपारी तीन वाजता विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार आणि पुरस्कार वितरण सोहळा होईल. याचे सूत्रसंचलन इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर हे करतील. दहाव्या सत्रात दुपारी पावणे चार वाजता सुप्रसिद्ध कथाकार बालाजी पेटेकर (नायगाव) हे कथाकथन करतील. याचे सूत्रसंचलन अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे जिल्हा संघटक संतोष सुर्यवंशी (उमरी) हे करतील.

 

 

 

 

 

अकराव्या सत्रात सायंकाळी चार वाजता तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथील सुप्रसिद्ध राष्ट्रीय कवी मधु बावलकर यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होईल. पनवेल जि. रायगड येथील ज्येष्ठ कवी नागनाथ डोलारे हे कवी संमेलनाचे उद्घाटन करतील तर आर्णी येथील सुप्रसिद्ध कवी तथा अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संवर्धन महामंडळाचे कार्याध्यक्ष प्रशांत वंजारे हे यावेळी काव्यविषयक आपले मनोगत व्यक्त करतील. पुसद जिल्हा यवतमाळ येथील सुप्रसिद्ध कवी प्रा. रविप्रकाश चापके हे या कवी संमेलनाचे बहारदार सूत्रसंचलन करतील.

 

 

 

 

कवी सदानंद मोरे (अकोला), सुभाष मानवटकर निळे पाखरु (हिंगणा, नागपूर), रामेश्वर पोहेकर (तेल्हारा), शाहिस्ता खान (यवतमाळ), बुद्धघोष लोणे (वणी), बबन मोरे, समाधान लोणकर, एस. टी. मोरे (सर्व हिंगोली), सोपान अंभोरे (रिसोड), बबन ढोके (हट्टा), अशोक वासाटे (किनवट), प्रा. रमेश वाघमारे (पुसद), प्रमोद तायडे (अकोला), शफी बोल्डेकर (बोल्डा ता. कळमनुरी), नानाभाऊ माळी (पुणे), कमलेश पाटील (वर्धा), राहुल श्यामकुंवर (रामटेक), गौतम शिंगणकर (आदिलाबाद), चंद्रकांत गायकवाड (देगाव ता. नायगाव), भीमराव बैलके, देविदास सुर्यवंशी (नायगाव) आणि नांदेड येथील क्रांतिकुमार पंडित, शेख आरिफ निमटेकर, माधव बैलके, आ. ग. ढवळे, ज्योती गायकवाड, एन. सी. भंडारे, प्रा. संजय मांजरमकर, डॉ. विलासराज भद्रे, शकुंतला गायकवाड इत्यादी कवी/कवयित्री आपल्या कविता सादर करतील.

 

 

 

 

शेवटचे बारावे सत्र समारोपाचे असून सायंकाळी सहा वाजता हे सुरु होईल. यावेळी मुख्य अतिथी म्हणून प्रा. डॉ. जनाबाई वाघमारे (कलबुर्गी, कर्नाटक) तर प्रमुख वक्ते म्हणून बसपाचे स्टार प्रचारक युवा नेते अकरम शेख (सिल्लोड) हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मानवाधिकार संघटनेचे शिवदास महाजन (पुणे), सामाजिक कार्यकर्ते सुकुमार पेटकुले (आदिलाबाद), बौद्ध धम्म प्रचारक प्रा. डॉ. आनंद भालेराव (किनवट), राधाई अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटीचे मार्गदर्शक नरसिंग सुर्यवंशी (नांदेड), सुफी शमसोद्दीन सय्यद (लातूर), शिवानंद जोगदंड (नांदेड), अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष सुरेश गंगासागरे (जालना) आणि विस्तार अधिकारी विठ्ठल भागाराम कांबळे (नांदेड) हे उपस्थित राहणार आहेत.

 

 

 

 

या सत्राचे सूत्रसंचलन राष्ट्रीय ढोर समाज संघटनेचे प्रदेश महासचिव नामदेव फुलपगार आणि कवी डॉ. विलासराज भद्रे हे करणार असून अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे युवा विभागीय प्रवक्ता चंद्रसेन गंगासागरे (घुंगराळा) हे आभार प्रदर्शन करतील.

 

 

 

एकूण बारा सत्रात भरगच्च कार्यक्रम होणार असून या सर्वांचा आस्वाद घेण्याचे आवाहन आयोजक मनीषभाऊ कावळे (बसपा मराठवाडा झोन प्रभारी), निमंत्रक उत्तम गायकवाड, लोकस्वराज आंदोलनाचे रावसाहेब पवार, संयोजक नारायण वाघमारे, रोहिदास सुर्यवंशी, अभिषेक साळे, हणमंत उतकर, जिल्हा संघटक संतोष सुर्यवंशी, दादाराव वाघमारे, नारायण अन्नपुरे, श्रीनिवास कांबळे, लक्ष्मण वाघमारे, अशोक घाटे, व्यंकटराव हराळे, सतीश भालके, जी. पी. गंगासागरे, सुधाकर खैराव, रमेश गंगासागरे, संजय बनसोडे, ॲड. रितेश बनसोडे, प्रसाद कमलेश्वर, बाबुराव नरहिरे, राहुल गोरे, देविदास गंगासागरे, सुरेश वाघमारे, विपुल देगलूरकर, सुभाष वाघमारे, परमेश्वर गंगासागरे, रमेश वाघमारे, प्रसेनजीत मांजरमकर, आनंद चंदनकर, दशरथ डोंगरे, नंदू देशमाने, विजय उतकर, राजू भालके आदींनी केले आहे.