शमशाबाद प्रतिनिधी दि.०९ :- राजू आणि ज्योती हे पती-पत्नी शमशाबाद मंडळाच्या नानाजीपूर गावातील आहेत. दोघेही रोजंदारीवर काम करत होते. राजुला दारूचे व्यसन होते आणि दारूच्या नशेत त्याची पत्नी ज्योती हिला रोज शिवीगाळ करत असे.
यावरूनच दोघांमध्ये भांडण झाले. दारूच्या नशेत पुन्हा भांडण झाल्यानंतर पत्नी ज्योतीने पती राजूची हत्या केली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून ज्योतीविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला ताब्यात घेतले. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसा कडून कळाले .


