देगलूर प्रतिनिधी,दि.१० :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला माफक दरात गुढीपाडवा व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमीत्त शंभर रुपयात आनंदाचा शिधा अंतर्गत एक किलो साखर, एक किलो आहे. रवा, एक किलो साखर, एक किलो पाम तेल असे चार वस्तू रास्त भाव धान्य दुकानाच्या माध्यमातून गोरगरीबांना देण्यात येत आहे.

या योजनेमुळे गोरगरीबांना सनासुदीच्या काळात आर्थिक भार कमी करण्यासाठी शासनाने पुन्हा ही योजना राबविली
यावेळी देगलूर येथील अनेक रास्त भाव दुकानातून आनंदाचा शिधा वाटप करण्यात आले आहे. यावेळी नगरसेवक प्रशांत दासरवार, तहसिल कार्यालयाचे कर्मचारी धर्मेकर साहेब व अनेक शिधापत्रिका धारक उपस्थित होते.

