देगलूर प्रतिनिधी,दि.:- आयुष्माण भव : अभियान अंतर्गत आरोग्य हिताचे विविध उपक्रम संपूर्ण देशात संपन्न होत आहेत.

त्या पैकी अवयव दानातुन गरजुना पुनर्जिवन मिळण्यासाठी जनजागृती साठी सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालय येथे अवयव दानाची शपथ उप जिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधिक्षक डॉ. नरेश देवनीकर यांनी प्रास्ताविक करून अवयव दान हॆ जीवन दान कसे मोलाचे आहे या बद्दल माहीती दिली.
सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदीपजी जंगम यांच्या प्रमुख उपस्थिति मधे डॉ. सुनील जाधव यांनी अवयव दान शपथ सर्वांना दिली.
या वेळी नायब तहसिलदार अन्गदजी नेटके सर व सर्व अधिकारी , कर्मचारी वर्ग उपस्थित होते. सर्वानी अवयव दानाचे महत्व कुटुंब , मित्र परिवार व सर्व सामान्य जणांना सांगुन प्रेरित करण्याची शपथ घेतली.


