यशदा पुणे येथील संशोधन आधिकारी डॉ बबन जोगदंड
देगलूर प्रतिनिधि दि १४:- विद्यार्थ्यांना जीवनामध्ये प्रगती करायची असेल तर त्यांनी नवनवीन कौशल्य शिकली पाहिजे, नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे, त्याचबरोबर इंग्रजी भाषा शिकली पाहिजे. आजचे जग हे स्पर्धेचे नसून सादरीकरणाचे आहे, असे मत यशदा पुणे येथील अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांनी व्यक्त केले .
ते देगलूर महाविद्यालयातील लोकप्रशासन विभाग व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्यावतीने आयोजित केलेल्या अभ्यासपूरक व्याख्यानात प्रमुख मार्गदर्शक म्हनुण बोलत होते.
“विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास व स्पर्धा परीक्षा ” या विषयावर डॉ. बबन जोगदंड यांचे आज व्याख्यान झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ , लोकप्रशासन विभागाचे प्रमुख डॉ.बालाजी कतुरवार व डॉ. देबडे सर यांची उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना डॉ. जोगदंड म्हणाले की,विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये उच्च शिक्षण घेतच आपल्यामध्ये अंतर्गत नवनवीन कौशल्य विकसित केले पाहिजे. त्यामध्ये व्यक्तिमत्व विकास, संभाषण कला, भाषण कला, काव्य लेखन याबरोबरच वाचन कला जोपासली पाहिजे.

विद्यार्थ्यांना कोणते अभ्यासक्रम पूर्ण करता येतील व नोकरीच्या भविष्यामध्ये काय संधी असतील याबद्दलही त्यांनी भाष्य केले. जीवनामध्ये संवाद कौशल्य, इंग्रजी भाषा,संगणकाचे ज्ञान, आत्मविश्वास आणि कष्ट ही पंचसूत्री अंगीकारावी असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना आपले बेसिक ज्ञान सुधारावे त्याचबरोबर इय्यता ४ थी ते १० वीचे पाठ्यपुस्तकांचा परत अभ्यास करावा, परिस्थितीला न घाबरता पुढे जाण्यासाठी समर्थपणे प्रयत्न करावेत.प्रयत्न करणाऱ्यांसाठी आकाश ठेंगणे आहे, असे ते शेवटी म्हणाले म्हणाले.
प्रारंभी डॉ. बालाजी कतुरवर यांनी या अभ्यासपूरक व्याख्यानामाची भूमिका विशद केली व स्पर्धा परीक्षा विभागाचे समन्वयक डॉ.संजय देवडे सर यांनी भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना नोकरी व स्पर्धेचे मार्गदर्शन आवश्यक आहे यासाठी असे उपक्रम राबवत असल्याचे सांगितले .
या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.

