बिलोली येथे मागासवर्गीय विद्यार्थिनींसाठी शासकीय वसतिगृहास मंजुरी.

 

बिलोली (प्रतिनिधी)दि.३०:- मागासवर्गीय विद्यार्थिनींसाठी शैक्षणिक संधी व सुरक्षित निवासाची आवश्यकता लक्षात घेता, बिलोली येथे नवीन शासकीय वसतिगृह स्थापन करण्याची मागणी या. खा. श्री अजित गोपछडे यांच्या द्वारा करण्यात आली होती.

या मागणीस महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री मा. श्री. संजयजी शिरसाट यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मंजुरी दिली आहे.

 

या वसतिगृहामुळे मागासवर्गीय मुलींना सुरक्षित निवासस्थान, पोषणयुक्त भोजन, अभ्यासासाठी अनुकूल वातावरण तसेच शैक्षणिक प्रगतीस पोषक सुविधा मिळणार आहेत. बिलोली शहरात अशा स्वरूपाचे वसतिगृह नसल्यामुळे अनेक विद्यार्थिनींना शिक्षणासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.

 

या निर्णयामुळे सामाजिक समावेशनाला चालना मिळणार असून, ग्रामीण व मागास भागातील विद्यार्थिनींना त्यांच्या शिक्षणासाठी भक्कम आधार मिळणार आहे.

 

या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व लोकप्रिय नेते मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे विशेष आभार मानण्यात आले आहेत.

 

सध्या वसतिगृहाच्या स्थापनेसाठी पुढील प्रशासकीय कार्यवाही सुरू झाली असून लवकरच त्याची अंमलबजावणी होणार असल्याचे समजते.