देगलूर प्रतिनिधी,दि. १६:-
गेल्या कित्येक वर्षापासून ‘तो वादग्रस्त’ मच्छी बाजार तेथून हटवण्याची अनेक लोकप्रतिनिधींनी, संघटनांनी,व एका ज्येष्ठ पत्रकाराने देखील ही मागणी मागील तीस वर्षाखाली केलेली होती. देगलूर मधील मच्छी बाजार हटवण्याची मागणी वारंवार केलेली असताना देखील स्थानिक राजकारण डोळ्यासमोर ठेवून त्या काळातील लोकप्रतिनिधींनी स्थानिक राजकारण्यांनी यावर कसल्याही प्रकारची कारवाई केली नाही. हे संपूर्ण देगलूर शहरवासीयांना कळून चुकले आहे. तरी या वादाला आता परत एकदा तोंड फुटल्याचे या निवेदनावरून स्पष्ट होत आहे.

पण सध्या देगलूर मध्ये नगर परिषदेवर प्रशासकीय कारभार चालत आहे त्यामुळे आता यावर काही कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शहरातील सुप्रसिद्ध वै. गुंडा महाराज मठ संस्थानच्या अगदी मागच्या बाजूला हा मांस विक्रीचा व्यवसाय मागील ४० ते ५० वर्षापासून चालतो. त्यातच शराहतील एकदम मध्यभागी असलेल्या हा परिसर आहे.
याच परिसरात मठ संस्थान तर्फे दर वर्षी दिंडी व अनेक धार्मिक उत्सव साजरे केले जातात. नित्याने हजारो माळकरी व शुद्ध शाकाहारी लोक या परिसरात येत असतात व त्यांना ह्या मास विक्रीचा त्यातून पसरणाऱ्या दुर्गंधाचा सामना करावा लागतो शहरातील प्रत्येक महिला, पुरुष, व बालकांना याच मार्गाने हैद्राबाद बँक, मोंढा, एल.आय.सी. कार्यालय, मशिनरी लाईन, कृषी सेवा केंद्र, भांडी मार्केट येथे आपल्या दैनंदिन कामासाठी जावे लागते.
अनेकदा याच मार्गाला वाहनाची कोंडी देखील होत असते. शिवाय हे मास विक्री व मत्स्य विक्री करणारे व्यावसायिक स्वच्छता पाळत नसल्यामुळे कुत्र्यांचा व मोकाट जनावराचा येथे मुक्त वास असतो त्याचा त्रास सर्व सामान्य नागरीकांना होत आहे.
वरील सर्व बाबीचा त्रास लक्षात घेऊन देगलूर येथील युवा व भारतीय जनता पार्टी देगलूर बिलोली मतदारसंघ प्रमुख दिगंबर कौरवार यांनी हे मच्छी मार्केट व मास विक्रीचा बाजार तात्काळ येथून हलवावा अशा मागणीचे निवेदन मुख्याधिकारी साहेब ,उपजिल्हाधिकारी कार्यालय,व पोलीस स्टेशन येथे दिले आहे.
दिगंबर कौरवार , सतीश जोशी ,संतोष आगलावे,राहुल पेंडकर ,विकास मोरे,साई बोनलावार ,योगेश मैलागींरे,ऋषिकेश येरगे,शुभम जुजनुरे,सुरज मामीडवार,विनायक नागशेट्टीवार,आदींच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.


