राज्यात के.सी.आर सरकार भ्रष्ट आहे ; किशन रेड्डी

 

 

तेलंगना प्रतिनिधी,दि.१२ :- केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांनी केसीआर यांच्यावर विश्वास ठेवून आपली फसवणूक करून घेऊ नका असे सांगत, पुढील निवडणुकीत ते राज्याचे सोने करतील असे खोटे अश्वाशन ते तेलंगणाच्या जनतेला देत आहेत. त्यांनी फक्त   आपल्या कुटुंबाचे सोने केले आहे, असा संताप व्यक्त केला.

 

 

 

 

 

लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी सिकंद्राबाद पथ कोपरा येथे सभा घेण्यात आली. पाणी, रस्ते, नियुक्त्या, पेन्शन, डबल बेडरुमची घरे अशा समस्या लोकांना भेडसावत असल्याचे सांगत राज्यात के.सी.आर भ्रष्ट सरकार असल्याची टीका त्यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत