महाराष्ट्रातल्या नऊ देवींना नऊ दिवसात भेटण्याचा आकांक्षा तम्मेवार यांचा अनोखा उपक्रम.

– कुंडलवाडी प्रतिनिधी-रुपेश साठे
      औरंगाबाद येथील रहिवासी कुमारी आकांक्षा धनंजय    तम्मेवार यांनी खास करून नवरात्र महोत्सव निमित्त एक अनोखा उपक्रम साजरा करण्यासाठी त्या आपल्या औरंगाबाद या शहरातून निघाल्या आहेत.त्या आपल्या मोटारसायकलीने महाराष्ट्रातील नव देवींना नऊ दिवसात भेटून समाजातील मुलींना प्रेरणा देण्याचे काम करणार आहेत .आज त्यांचा पाचवा दिवस असून त्या कुंडलवाडी मार्ग बासर च्या सरस्वती देवी ला व पुढे माहूरच्या रेणुका देवी ला जाणार आहेत. या नवरात्र निमित्त त्यांनी असा निश्चय केला होता की, आपण महाराष्ट्रातील नऊ देवींना नऊ दिवसात भेटूया ज्यामध्ये नाशिकची सप्तशृंगी देवी, चतुर्श्रुंगी देवी, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी ,बासरची सरस्वती देवी ,माहूरची रेणुका देवी, अमरावतीची अंबादेवी, वाशीम येथील देवी अशा नऊ देवींचा त्यांच्या भेटी मध्ये समावेश आहे. त्यानंतर त्या वाशिम येथून परत आपल्या औरंगाबाद या गावी रवाना होणार आहेत .जवळपास त्यांना या नऊ दिवसात दोन हजार दोनशे किलोमीटरचा प्रवास आपल्या मोटरसायकलीवर करावा लागणार आहे. विशेष म्हणजे त्यांना बाईक रायडिंग ची खूप आवड आहे. त्या सध्या बी .ई. मेकॅनिकल इंजिनिअर च्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहेत. त्यांचे कुंडलवाडी शहरात आगमन होताच कुंडलवाडी शहरातील आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष श्याम उत्तरवार व त्यांच्या पत्नी सौ. मीनाक्षी उत्तरवार, बाबुशेठ कोंडावार  यांनी सर्वप्रथम त्यांचे फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत करुन कुंडलवाडी येथील आर्य वैश्य समाजाच्या वतीने कुमारी आकांक्षा तमले तम्मेवार यांचा शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन स्वागत केले व पुढील प्रवासासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत