किनवट प्रतिनिधी सी एस कागणे , दि.07 दरसांगवी ( चि .) येथील शेतकरी माधव गणपतराव सुर्यवंशी वय ५८ वर्षे यांनी बॅकेचे , खाजगी कर्ज व अतिवृष्टी झालेल्या पाऊसाने शेतातील सोयाबिन खराब झाल्याने सर्व बाबीस कंटाळून दि. ६ ऑक्टोबर रोजी दुपारी त्यांनी शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली . त्यांच्या पश्चात चार मुली एक मुलगा नात , नातु असा मोठा परिवार आहे . ते पत्रकार अरविंद सुर्यवंशी यांचे ते वडील होत . किनवट पोलिसात त्यांच्या आत्महते ची नोंद केली असुन पोलीसानी पंचनामा केला .उप . जिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे शवविच्छेदन करून दर सांगवी येथे दिनांक ६ आक्टोबर रोजी सायंकाळी ५ – ३० वाजता दरसांगवी (चि) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले .