अमरनाथ यात्रेकरूंनी नांदेड ते रत्नेश्वरी रस्त्यावर आणि गडावर जागोजागी हजारो बियां टाकून धर्मभूषण अॅड.दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या २१ व्या रत्नेश्वरी पाऊस दिंडीच्या समारोपप्रसंगी पावसासाठी रत्नेश्वरीला साकडे घातल्या नंतर रिमझिम पावसाला सुरुवात झाली.

अमरनाथ यात्री संघ,भाजप महानगर नांदेड, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सकाळी पाऊस दिंडीचे आयोजन करण्यात आले.सकाळी ६ वाजता महंत कैलाश महाराज वैष्णव यांच्या हस्ते दिंडीला झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली.
यावेळी सिद्धगौडा बिरगे, मुकेशसिंह तौर,बालाजी कवानकार, शंकर वंगलवार,सुरेश दलबसवार यांची प्रमुख उपस्थिती होती. ध्वनिक्षेपक असलेला रथ व ढोल ताशाच्या गजरात यात्रेकरूंनी मार्गक्रमण चालू केले. श्रीराम मंदिर लातूर फाटा नांदेड येथे पवन गुरुखुदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्व यात्रेकरूंचा शाल व पुष्पहाराने सत्कार करून चहा फराळ दिले .सुभाष देवकते,संजय जाधव,माधव मस्कले यांनी सिडको येथील महादेव मंदिरात सर्वांचा सन्मान केला.
मनोरमा व अरुण लाटकर,जयश्री व गंगाधर फलटणकर,सुनीता व बालाजी लाटकर,शैला व वैजनाथ पत्तेवार,अनिता व जयवंत पांडागळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. दिंडी विष्णुपुरी ला पोहोचली असता भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. संतुकराव हंबर्डे यांच्यावतीने अल्पोहार देऊन जंगी स्वागत करण्यात आले. रस्त्यामध्ये नानकसर गुरुद्वाराचे दर्शन घेऊन अरदास करण्यात आला. झरी गावात नांदेडभूषण माधवराव पाटील झरीकर यांनी दरवर्षीप्रमाणे उत्तम व्यवस्था केली होती.
या वेळी झालेल्या स्वागत समारंभाचे सूत्रसंचलन ज्येष्ठ पत्रकार डिगा पाटील यांनी केले. यावेळी व्यासपीठावर अनघा व अभय शृंगारपुरे,संगीता व लक्ष्मीकांत पाठक, सुनिता व सुधाकर ब्रह्मनाथकर,प्रियंका व गजानन मामीडवार यांची प्रमुख उपस्थिती होती. दररोजचा पायी चालण्याचा सराव असल्यामुळे यात्रेकरूंनी १८ किमी चे अंतर सहजच पूर्ण केले. जयश्री व दिलीप ठाकूर यांच्या हस्ते रत्नेश्वरी मातेची आरती करण्यात आली.
अन्नपूर्णा मंदिरात झालेल्या समारोप प्रसंगी सुषमा गहेरवार, जयश्री जयस्वाल, मीरा राजपूत कोल्हापूर, सुषमा हुरणे यांच्या हस्ते यात्रेकरूंना टी शर्ट, रेनकोट व टोप्या देण्यात आल्या.दरवर्षी प्रमाणे दानशूर व्यापारी जितेंद्र भयानी यांच्यातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.अंजली व अरविंद चौधरी,पल्लवी व शशिकांत कुलकर्णी,सुप्रिया व सुहास क्षीरसागर यांच्यातर्फे सर्वांच्या परतीच्या प्रवासासाठी वाहनांची व्यवस्था आली.
पदयात्रा यशस्वी करण्यासाठी अरुण काबरा,कालिदास निरणे,संतोष चेनगे,शिवप्रभू कामजळगे, सविता काबरा,सीमा निरणे, संतोष भारती, अविनाश भयानी यांनी परिश्रम घेतले. गेल्या २१ वर्षापासून सातत्याने बियाचे रोपण करत असल्यामुळे नांदेड ते रत्नेश्वरी रस्त्यावर तसेच गडावर मोठ्या प्रमाणात झाडे लागल्यामुळे दिलीप ठाकूर व अमरनाथ यात्रेकरूंचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

