नवव्या अ. भा. गुरु रविदास साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांची निवड.

 

 

नांदेड प्रतिनिधी दि.१९:-  लातूर येथे पुढील वर्षी होऊ घातलेल्या नवव्या अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नांदेड येथील सुप्रसिद्ध साहित्यिक लेखक विचारवंत व परखड वक्ते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांची निवड करण्यात आली आहे.

 

 

 

 

 

नांदेड येथे रविवार दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी थाटात संपन्न झालेल्या आठव्या अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलनात अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराव लकवाले यांनी ही घोषणा केली. या घोषणेचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले.

 

 

 

 

साहित्य संमेलन घेण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो, आर्थिक ओढाताण होत आहे, त्यामुळे पुढील साहित्य संमेलन होईल की नाही अशी खंत आठव्या साहित्य संमेलनाचे मुख्य प्रवर्तक इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून व्यक्त केली होती, त्यास उत्तर देताना परिसंवादाचे अध्यक्ष शिवाजीराव लकवाले यांनी पुढील साहित्य संमेलन लातूर येथे होईल आणि साहित्य संमेलनाची परंपरा चालू राहील अशी ग्वाही दिली.

 

 

 

 

यावेळी उपस्थित पन्नासहून अधिक लातूर जिल्ह्यातील प्रतिनिधी व संमेलनातील साहित्य रसिकांनी शिवाजीराव लकवाले यांच्या घोषणेचे टाळ्यांच्या गजरात जोरदार स्वागत केले. लातूरच्या नवव्या अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलनाचे अध्यक्ष इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर हे राहतील आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रमाची रुपरेषा ठरविण्यात येईल असे बालाजीराव साबळे यांनी स्पष्ट केले.

 

 

 

लातूर येथील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांचा शिवाजीराव लकवाले, प्रवीण जेठेवाड, व्यंकटराव दुधंबे, उत्तम गायकवाड, बालाजीराव साबळे, खंडू बनसोडे, उमेश बोरुळे, गोपाळ सुर्यवंशी, संजीव वाघमारे, श्रीनिवास वाघमारे, सौदागर कांबळे, बाबुराव वाघमारे आदींनी सत्कार केला.