पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहना नुसार धर्मभूषण ऍड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून अमरनाथ यात्रेकरूंची देशभक्तीची शपथ.

 

नांदेड प्रतिनिधी :- अमरनाथ यात्री संघाच्या वतीने आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली इंधन बचत, स्वदेशीचा वापर, अनावश्यक खर्च टाळणे तसेच देशहित जपण्याची सामूहिक शपथ घेण्यात आली.संकल्प यावेळी करण्यात आला. विशेष म्हणजे, भारतात सर्वप्रथम असा उपक्रम नांदेड येथे राबविण्यात आला.

 

 

अमरनाथ यात्रा अत्यंत अवघड व खडतर असल्याने यात्रेकरूंना शारीरिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी गेल्या २६ वर्षांपासून सलग तीन महिने दररोज सकाळी नियमित वॉकिंग, ओपन जिममधील व्यायाम तसेच प्राणायाम घेतला जात आहे. शरीरासोबत मनही प्रसन्न राहावे यासाठी दररोज विनोद सांगण्याचाही उपक्रम राबविला जात असून त्यामुळे वातावरणात उत्साह व सकारात्मकता निर्माण होत आहे.यावर्षी यात्रेकरूंची संख्या वाढल्यामुळे ३ व १७ जुलै रोजी दोन वेगवेगळे जथ्थे अमरनाथ यात्रेसाठी रवाना होणार आहेत. संपूर्ण भारतात फक्त नांदेड येथेच यात्रेकरूंची अशा प्रकारे पूर्वतयारी केली जाते, असे आयोजकांनी सांगितले.

 

 

 

बुधवारी सकाळी झालेल्या कार्यक्रमात सुभाष देवकत्ते यांनी चालण्याचे महत्त्व विषद केले. संजय चौधरी यांनी ऑनलाईन बुकिंगविषयी माहिती दिली. छाया चौधरी यांनी भजन सादर केले, तर साईप्रसाद हळदे यांनी ओपन जिमचे फायदे समजावून सांगितले. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या राजश्री हुरणे यांचा सत्कार जयश्री ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी दिलीप ठाकूर यांनी उपस्थितांकडून सामूहिक शपथ वदवून घेतली. प्रसंगी मंदाकिनी सुरनर, गौरी व साईप्रसाद देवकत्ते, शर्मिला व प्रशांत होट्टे, वंदना व हनुमानसिंह चौहान, सुचित्रा व प्रल्हादराव नवघरे, कैलाश महाराज वैष्णव, संगीता व प्रशांत जोशी, अन्नपूर्णा व श्यामराव खराणे, सलोना व विजयसिंह चव्हाण, छायाबाई व अशोक दालपे, शोभा व नारायण चव्हाण, राधा व किशन चव्हाण, श्रीकांत अकोलकर, नंदा व भारत चव्हाण, गंगामणी व बजरंग खंदारे, भाग्यश्री व नामदेव पांचाळ, मीरा व जयप्रकाश येवले, मीना व विश्वनाथ झुंजारे तसेच मेधा व रणजीत धर्मापुरीकर यांनी “देश प्रथम” ही भावना जपत राष्ट्रहितासाठी सदैव कार्यरत राहण्याची ग्वाही दिली.

 

 

यात्रेकरूंमध्ये मोठा उत्साह दिसून येत असून “निरोगी शरीर, सकारात्मक मन आणि राष्ट्रभक्तीची भावना” या त्रिसूत्रीवर विशेष भर दिला जात आहे.