देगलूर तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी बोंब ठोकून तालुका कृषी कार्यालयाला ठोकले कुलूप.

देगलूर प्रतिनिधी दि २९ :- पीकविमा कंपनीचे शेतकऱ्यांना लूटण्याचे धोरण, २५% अग्रीम रक्कम खात्यात जमा न करणे, नुकसानीचे क्लेम करूनही पंचनामे न करणे या विरोधी व दुष्काळी निधी जिल्हा मध्यवर्ती बँकेत पैसे पडूनही शेतकऱ्यांच्या खात्यात आजतागायत दुष्काळ निधी पडले नाहीत.., तसेच पीएम किसान सन्मान निधीतील त्रुटींमुळे हजारो शेतकरी वंचित राहिलीत..

या सर्व समस्या घेऊन अतिवृष्टीग्रस्त संतप्त शेकडो शेतकरी हे शेतकरी नेते कैलास येसगे कावळगावकर यांच्या नेतृत्वाखाली तहसील व कृषी कार्यालयात जमली खरी पण एकही जबाबदार अधिकारी भेटले नसल्यामुळे आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयात बोंब ठोकून कार्यालयाला कुलूप ठोकले….

 

 

 

 

 

 

शेतकऱ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य नाही झाल्या तर यापेक्षाही आक्रमक आंदोलन करू असा इशारा यावेळी कैलास येसगे यांनी दिले… या विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय कार्यालयाला सादर करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *