देगलूर महावितरण च्या निष्काळजीमुळे गावकऱ्यांची दिवाळी अंधारात साजरी.

 

 

देगलुर प्रतिनिधी, दि.१८:- (पंकज सोनकांबळे) देगलूर शहरालगत असलेल्या बागन टाकळी हे गाव गेल्या तीन दिवस अंधारात सन साजरा करत आहे.

 

या गावांमध्ये सतत तीन दिवस झाले गावांमध्ये लाईट नाही त्यामुळे गावातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. गावात लाईट नसल्यामुळे व डासांचा प्रादुर्भाव असल्या मुळे गावातील नागरिकांना व लहान मुलांना झोप येत नाही  व त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

 

 

गावकऱ्यांची संपूर्ण दिवाळी दिवाळी अंधारामध्ये साजरी झाली आहे.  सध्या शेतात हरभरा पिकाची लागवड असून त्याला पाणी देण्याची गरज आहे त्यामुळे लाईट नसल्यामुळे शेतकरी बांधव देखील त्रस्त आहेत वारंवार महावितरण ला या गोष्टीचे तक्रार करून देखील याकडे कोणीही अधिकारी किंवा कर्मचारी लक्ष देत

 

 

 

 

 

नाहीत, गावातील लोकप्रतिनिधी सरपंच ग्रामपंचायत सदस्य हे त्या गोष्टीचा पाठपुरावा करत नाहीत, त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत.

 

 

 

 

या संदर्भात लाईट ऑफिस मध्ये विचारले असता दोन दिवसांमध्ये डीपी बसवतो असे त्यांची म्हणणे आहे तरी आत्तापर्यंत गावामधे लाईट आली नाही कर्मचारी व सरपंच लोकप्रतिनिधींना गावची समस्या दूर करावी असे ग्रामस्थाचे म्हणणे आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *