देगलूर महाविद्यालयात अकरावीच्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत.
देगलूर प्रतिनिधी,दि.२८: महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आपले ध्येय निश्चित करून विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतल्यास यश नक्की प्राप्त होते असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. मोहन खताळ यांनी केले.
दि.२८जुलै रोजी देगलूर महाविद्यालयात इयत्ता अकरावी वर्गास प्रारंभ करण्यापूर्वी नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

यंदा अकरावी वर्गाचे प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने पार पडत आहे ,प्रवेश प्रक्रियाची तिसरी फेरी पूर्ण होताना शिक्षण विभागाकडून वर्ग प्रारंभ करण्याची निर्देश दिले आहेत ,यानुसार देगलूर महाविद्यालयात अकरावी कला,वाणिज्य, विज्ञान शाखेचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत.
पहिल्या दिवशी इयत्ता अकरावी नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्राचार्य पुढे म्हणाले महाविद्यालयात शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी दिशा निवड करावी ,ध्येय निश्चित करावे आणि पुढील शिक्षणास आपला प्रारंभ करावा तरच विद्यार्थ्यांना जीवनात यश साध्य करता येईल.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ एम.एम. चमकुडे ,उपप्राचार्य डॉ. शेरीकर व्ही.जी यांनी नवप्रवेशित विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्राविषयी ,महाविद्यालयातील नियमाविषयी मार्गदर्शन केले यावेळी विषय शिक्षकांच्या हस्ते प्रत्येक विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पर्यवेक्षक प्रा. एस. एन. पाटील यांनी मानले यावेळी प्रा. ई.के. पाटील प्रा. शिवचरण गुरुडे प्रा.ऐनलावार निकीता, प्रा. सौ.वद्देवार एस वाय ,प्रा.एस वाय शेख प्रा.डाॅ.गुजे पी.बी. प्रा.तुकाराम
लागले प्रा. सिताराम हाके प्रा. महेश कुलकर्णी प्रा.डी. ए. पाटील, एस व्ही सावळे प्रा. कोंडेकर सचिन प्रा. कपिल तोटावार प्रा.गजानन कोकडवार , प्रा.नितीन बोरगावकर,प्रा. भुरे आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

