देगलूर प्रतिनिधी : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) तर्फे वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आयोजित ‘नीट’ परीक्षा रविवारी शांततेत पार पडली. यंदा तालुका पातळीवर नीट चे केंद्र होते. विशेषकरून ग्रामीण भागातील तीन राज्याच्या सीमेलगत असलेल्या देगलूर महाविद्यालय केंद्र असल्याने विद्यार्थ्यांना जाणे सोपे गेले.
देगलूर महाविद्यालयाने योग्य नियोजन केल्याने परिक्षा सुरळीत पार पडली आहे. पेपर सोडवून केंद्राबाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांमध्ये तणावा ऐवजी काहीसा उत्साह आणि चेहऱ्यावर आनंद दिसत होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाची नीट सोपी गेल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
एनटीए तर्फे रविवारी देशभर नीट परीक्षा पार पडली. देशभरातून जवळपास १६ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. एकूण ६७२ पैकी६५३ विद्यार्थ्यांनी देगलूर शहरातील देगलूर महाविद्यालय केंद्रांवर परीक्षा दिली.११ वाजल्यापासून १:३० वाजेपर्यंत केंद्रावर रिपोर्टिंगची वेळ देण्यात आली होती. त्यामुळे बाहेर गांवच्या विद्यार्थ्यांनी सकाळपासून केंद्रांवर गर्दी केली होती.

कडक बंदोबस्तात विद्यार्थ्यांना अगदी साध्या कपड्यांमध्ये प्रवेश देण्यात आला. हॉलमध्ये प्रवेशापूर्वी कसून तपासणी करण्यात आली. त्यामुळे थोडी तारांबळही झाली,पण नियोजन योग्य झाले.यावेळी निरीक्षक म्हणून डाॅ.दिपक वाघमारे व डाॅ.रामेश्वर गोवले होते.देगलूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मोहन खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र अधीक्षक डाॅ.अनिल चिद्रावार सुपरवायझर म्हणून डाॅ.व्हि.जी.शेरीकर आणि प्रा.संग्राम पाटील यांनी सुनियोजित कार्य पार पाडले आहे.
तसेच महाविद्यालयीन शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून ही मोठे सहकार्य मिळाले. अ.व्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेम्बरेकर उपाध्यक्ष जनार्धन चिद्रावार सचिव डॉ.कर्मवीर उनग्रतवार सहसचिव राजकुमार महाजन कोषाध्यक्ष विलासशेठ तोटावार कार्यकारिणी सदस्य सुर्यकांत नारलावार देवेंद्रशेठ मोतेवार ,गंगाधरराव जोशी रविंद्रअप्पा द्याडे चंद्रकांत नारलावार विजयकुमार उनग्रतवार गुरुराज चिद्रावार सर्व संचालक मंडळ परिक्षा सुरळीत पार पडण्यासाठी मार्गदर्शन करून लक्ष ठेवून होते. केंद्रांवर परीक्षा शांततेत पार पडली.
