ज्ञानसंपन्न समृध्द समाज घडविण्यासाठी ग्रंथालयांचा विकास होणे आवश्यक

  हिंगोली, दि. १९ :-  ज्ञान संपन्न समृध्द समाज घडविण्यासाठी ग्रंथालयाचा विकास होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. जगदीश कदम यांनी केले.

 

डॉ.ए.पी.जे.अब्दूल कलाम यांचा जन्मदिन १५ ऑक्टोंबर हा दिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. त्यानिमित्त येथील जिल्हा ग्रंथालयात दि. १५ ते १८ ऑक्टोंबर, २०२२ या कालावधीत ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले होते. काल या ग्रंथ ग्रंथप्रदर्शनाच्या समारोपीय कार्यक्रमात जेष्ठ साहित्यिक प्रा.जगदीश कदम बोलत होते.

यावेळी प्रा. अशोक अर्धापुरकर , प्राचार्य नागनाथ पाटील, कवी  श्रीनिवास मस्के, कवी शिवाजी कऱ्हाळे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आ.अ. ढोक, संगत प्रकाशन नांदेडचे प्रकाशक संजय सुरनर उपस्थित होते.

 

यावेळी वाचन संस्कृती व ग्रंथालयांचे महत्व विषद केले. तसेच मान्यवर कवी यांनी  साहित्याचे /वाचनाचे महत्व, सामाजिक विषयावर, कृषी, देशभक्तीपर कविता सादर केल्या. तसेच वाचनाचे व वाचनालयाचे महत्व सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *