या शाळातूनच खऱ्या अर्थाने ग्रामीण आणि शेवटच्या घटकातील विद्यार्थी घडत असतो असे मत व्यक्त केले
नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या • ते २० विद्यार्थी पटसंख्या असलेल्या ३३६ शाळा लवकरच बंद कायमस्वरूपी बंद करण्यात येणार असल्याची चर्चा होते आहे.

किंबहुना या अनुषंगाने शासन स्तरावरही हालचाली सुरू असल्याचे
समजते. या शाळातूनच खऱ्या अर्थाने ग्रामीण आणि शेवटच्या घटकातील विद्यार्थी घडत असतो. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा कोणत्याही प्रकारे बंद करण्यात येऊ नयेत, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांची भेट घेऊन आपण मागणी करणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी दिली.
शिक्षण उपसंचालक लातूर यांनी २० सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांची बैठक घेत ० ते २० पटसंख्या असलेले शाळांचे नजीकच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये समायोजन करण्याबाबत सूचना देण्यात आल्याच्या
अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारी (प्राथमिक) डॉ. सविता बिर्गे यांनी दि. २८ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील
पंचायत समितीच्या सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना एक पत्र पाठवून
सन २०२१ २२ च्या युडायीजनुसार शून्य ते वीस पटसंख्या असलेल्या शाळा जवळच्या शाळांमध्ये समायोजन करण्याबाबतचा तपासणी अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
यामुळे नांदेड जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होणार आहे. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना खाजगी शाळा परवडणाऱ्या नसल्याने जिल्हा परिषदेच्या शाळेच्या
माध्यमातून त्यांना शिक्षणाचे धडे दिले जातात.शिक्षणाच्या प्रवाहात आणल्या जाते.
किंबहुना भविष्यातील राष्ट्रनिर्मितीतही अशा विद्यार्थ्यांचे योगदान मोठे असते. त्यामुळे या शाळा बंद करणे सर्वसामान्य नागरिकांच्या शिक्षणावर गदा आणण्यासारखे आहे.

