पाटण तालुक्यातील प्रत्येक गावात काल बारमाही रस्ते

सातारा दि ०७ :-  पाटण तालुक्यातील १३० गावे, वाड्या वस्त्यांवर बारमाही रस्ते नव्हते. काल अपवाद वगळता तालुक्यातील प्रत्येक गावात बारमाही रस्ते झाले आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी काल  केले. पाटण तालुक्यातील अर्थसंकल्पीय मंजूर माजगाव – उरुल रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी श्री. देसाई बोलत होते.

 

पाटण तालुका डोंगराळ असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, या परिसरात पाऊस झाला की गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे या भागात बारमाही रस्ते होणे गरजेचे होते. काल तालुक्यात सर्वत्र बारमाही रस्ते आहेत. वीज, पाणी या मुलभूत सोयीही करण्यात आल्या आहेत. काल जिल्ह्याची जबाबदारी माझ्यावर आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी जनता नेहमीच साथ देईल असा विश्वासही पालकमंत्री श्री. देसाई यांनी व्यक्त केला.

यावेळी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *