महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे .या संतांच्या भूमित अनेक थोर संत होऊन गेले. समाज उध्दाराचे महान मंदिर या महाराष्ट्रामध्ये संतांनीच उभारले. समाजसुधाराचा पाया प्रथम स्वामी चक्रधर ज्ञानदेव यांनी घातला, नामदेवांनी त्यांच्या भीती बांधल्या, एकनाथांनी त्यांच्यावर घुमट चढविला, तुकाराम महाराज त्याचे कळस झाले, आणि गाडगेबाबांनी त्या कळसावर समाजोद्धाराचा पत्ताका फडकविला .

गाडगेबाबांनी समजोद्धारासाठी अनेक प्रयत्न केले त्यांनी अंध, पंगु दिन- दुबळया, महारोगी अशा लोकांमध्ये देव पाहिला. आणि त्यांची सेवा केली. ते लोकांना आपल्या कीर्तनातून उद्देशून सांगत की,”बापहो देव देवळात नाही, तो माणसाच्या अंतकरणात वास करत असतो”.
“र्तीर्थि धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी!, मंदिरात देव दगडाचा असतो गवंडी त्याचा बाप झाला, म्हणून कशाला करता पूजा त्या दगडाची माणसाची, माणुसकीची पूजा करा. असे हे निश्चयाचे महामेरू राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचा जन्म महाशिवरात्री बुधवार २३ फेब्रुवारी १८७६ रोजी शेनगाव (जि.अमरावती)येथे झाला.
बालपणीचे त्यांचे नाव “डेबुजी” परंतु नागपूरकडे त्यांना चापरेबुवा म्हणत, कोकणात गोधडेमहाराज, साताऱ्याकडे लोटके महाराज, गोकर्ण महाबळेश्वर कडे चिंधेबुवा आणि पुणे – मुंबईकडे गाडगेबाबा म्हणत, त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी जानोरकर आईचे नाव सखुबाई. त्यांचा घरचा व्यवसाय शेती होता. घरातील सर्वजण मरिआई,मसोबा-सटवाई हे देव मानणारे होते.
त्यांची देवावर खूप भक्ती होती पण वडील दारूच्या आहारी गेल्याने घराची परिस्थिती बिकट झाली. व काही दिवसात डेबूजीचा वडिलांची प्राणज्योत मावळली. त्यावेळी डेबुजीचे वय आठ वर्षाचे होते. घरातील कर्ताधर्ता पुरुष गेल्याने घर एकदम मोडकळीस आले व सखुबाईंनी आपल्या भावाच्या गावी जाण्याचा निर्णय घेतला.
अकोला जिल्ह्यात मुर्तीजापुर तालुक्यात दापूरे या गावी डेबु वाढु लागला. आपल्या मामाच्या गावी राहून डेबू आपल्या मामांना कामात मदत करू लागला. गुराढोरांची राखण करणे. त्यांची विशेष काळजी घेणे, व शेतीची कामे तो करू लागला. मामा व मामी डेबूच्या वागण्याला खुश झाले तेही डेबुला आपल्या मुलापैकीच एक मुलगा आहे. असे समजू लागले आणि इ.स १८९२ ला. अमरावती जिल्ह्यातील कमलापूर या गावचे धनाजी परीटची मुलगी मुक्ताबाई यांच्याशी डेपोजी चे लग्न झाले .
इस संसार मे या दुनियेत वावरताना बाबांना तीन मुली व एक मुलगा झाला. असेच बरेच दिवस गेले एक दिवशी डेबुजी रानात गेले असता, त्यांना साक्षात्कार झाला त्यांना एक महर्षी भेटले ते दोघे मिळून मंदिरात गेले व त्यांनी बाबाच्या डोक्यावर हात ठेवला बाबांनी डोळे मिटले त्यानंतर बाबा भानावर आल्यावर इकडे-तिकडे पाहिले पण त्यांना ते महर्षी दिसले नाहीत.आणि तेव्हापासून बाबा कसले तरी गुड चिंतनात राहू लागले.घर,दार शेतीवाडी,बायका पोरं,आई, मामा मामी यांच्या सगळ्यांचा विसर पडू लागला.
आणि १ फेब्रुवारी १९०५ सालि त्यांनी समाजाच्या उद्धारासाठी समाजाला अंधश्रद्धाच्या तावडीतून मुक्त करण्याची वयाच्या २९ व्या वर्षी त्यांनी ग्रह त्याग केला. काही दिवस अज्ञात वासात राहून बाबांनी एका विचित्र वेशात जगासमोर प्रकट झाले. वाढलेल्या झिंज्या,दाढी -मिशा, हातात खराटा, एका हातात पुटके खापर असा हा वेश परिधान करून ते गावोगावी फिरू लागले.
कीर्तन करू लागले गोरगरीब, दिन दुबळ्या, महारोगाची,अंध- पंगुची सेवा करू लागले. व लोकांना स्वच्छतेचा महामंत्र देण्यासाठी स्वतः गावन गाव झाडू लागले. त्यांचे पाहून लोकही हातात खराटा घेऊन त्यांच्यासोबत झाडू लागले.
बाबानी जनकल्याणाचे वृत्त हाती घेऊन समाजातील दिनदुबळया, गोर -गरीब,अंध,पंगु इ. लोकांची सेवा करण्यात एक दिवस घालू लागले.
आणि त्यात त्यांनी कोणताही द्वेष भाव केला नाही.जात-पात उच्च निच्य , रंग रूप पाहिले नाही. निस्सीम सेवा ते लोकांची करत राहिले. बाबा कोणीही गावात गेले की, प्रथम ते गाव झाडून त्या गावांमध्ये सायंकाळी कीर्तन करत त्यांच्या कीर्तनाला ना टाळ होता ना मृदंग दोन दगड उचलायचे, आणि ” गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला”! असे म्हणून त्यांचे कीर्तन सुरू व्हायचे.
प्रथम तर लोकांना वाटत होतं की हा माणूस काय कीर्तन सांगणार, पण जेव्हा बाबा कीर्तन सुरू करत तेव्हा लोक मंत्रमुग्ध होऊन ऐकत. बाबा कीर्तनातून सांगत.
भुकेल्याना अन्न,तहानलेल्यांना पाणी, उघड्या- नागड्यांना वस्त्र,गरीब मुला मुलींना शिक्षण, बेघरांना आसरा, रोग्यांना औषधोपचार, बेकारांना रोजगार मुक्या प्राण्यांना अभय, गरीब तरुण-तरुणीचे लग्न,दुखी व निराशांना हिम्मत, हाच आमचा रोकडा धर्म. हीच आमची भक्ती व देवपूजा आहे. बाबा पुढे म्हणत, आपल्या तोंडाने आपली बढाई करणे म्हणजे मूर्खपणा होय.
” बडा बढाई ना करे! बढा ना बोले, बोल!
हिरा मुखसे कभी ना बोले, लाख रुपया मोल”!!
एका एका गावात पाच -दहा मंदिरे, एक खंडोबाचे एक , मारुतीचे ,एक महादेवाचे ,एक विठ्ठल रूखमाईचे अरे एवढे मंदिर कशाला बांधतात? आणि त्या देवळा तुमचा देव राहतो का? लोक म्हणत नाही.
मग तुम्ही इतकी देवळे कशाला बांधता ? असे ते लोकांना आपल्या कीर्तनातून सांगत दगडा धोंड्यात देव नसून हा देव दीन दुबळ्या व मुक्या जनावरात आहे. त्यांची सेवा करा त्यांना भाकरी द्या असे बाबा सांगत. आपल्या कीर्तनातून बाबा लोकांना प्रश्न विचारात, “बापू हो तुम्हाला कधी देव भेटला का? नाही- लोक “मग,तुम्ही त्या दगडाची एवढी पूजा कशाला करता? सगळे गप्प बसत.
तुम्ही देवाले नवस बोलता.”माझं लेकरू चांगलं होऊ दे! तुला बकर कापतो ,कोंबड कापतो,अरे …..अरे…..तुमचे लेकरू चांगलं होण्यासाठी तुम्ही त्या निष्पाप जिवाचा का बळी घेता.का मारतात त्यांना, असे बाबा लोकांना विचारत आणि पुढे म्हणत,
“जन्मवरी पोसे लेकुराच्या परी हाती घेऊनिया सुरी उभा राहे!”
असा कसा तुमचा देव! घेतो दुसऱ्याचा जीव! “गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला”
बाबांनी अनेक गाव फिरली. पण बाबांना स्वच्छता कुठे दिसून आली नाही.
जिथे तिथे घाणीचे साम्राज्य होते. व त्यातल्या लोकांना वेगवेगळे आजार होत होते. आणि त्या आजारातून सुटका म्हणजेच, लोकांना मृत्यूला सामोरे जावे लागत होते.आणि तीथले लोक देवाला नवस करतात की कोंबडा कापतो,बकरे कापतो, पण बाबांनी लोकांना अंधश्रद्धेच्या तावडीतून बाहेर काढण्यासाठी बाबा सांगत की,बाबारे अशा या घाणीने रोगराई पसरते.
तुम्ही तुमचे गाव स्वच्छ करा.मग पहा ही रोगराई झटक्यात पळते की नाही ते पहा.लोकांना बाबाचे म्हणणे पटू लागले,देवाला नवस करण्याने रोगराई पळत नाही. तर हि रोगराई आपले गाव स्वच्छ केल्याने नाहीशी होते.आणि आपणास कोणतेही आजार होत नाहीत. असे लोकांना वाटू लागले.
“देव देव करता शिल्ल माझं मन ! देव देव म्हणून तुकोबा मनत ,” मी खूप फिरलो मले शिन पण आला, पण मला कुठेही देव दिसला नाही पण त्यांना दिसलं काय? पाणी……. आणि……. पाषाण………..!
मग मला दिसलं काय? दगडाचा देव गंगेचे पाणी ! पाणि दिसल देव नाही.
संत कबीर म्हणत “जत्रामे फित्रा बिठाया! तिरथ बनाया पानी
दुनिया भई दिवानी !पैसे की धुलधानी!.
तिर्थाला जाणे देवाचा संबंध नाही. पैशाचा नाश खराबा आहे.
बाबांची शिक्षणाविषयी खूप मोठी आस्था होती ते लोकांना सांगत की, बापहो तुम्ही शिकला नाही तर चालेल पण तुमच्या लेकरांना शिकवा. त्यांना डॉक्टर बनवा . इंजिनियर बनवा, शिक्षक बनवा, वकील बनवा, शिक्षणाने माणूस शहाणा होतो.शिक्षण हे एक धन आहे शिक्षण नसल्यामुळे अनेक लोक वाया गेले. त्यांना सावकारांनी लुबाडले म्हणूनच बाबा आपल्या कीर्तनातून लोकांना शिक्षणाचे व स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगत.

बाबांनी शिक्षणाचा खूप मोठा डोंगर रचून ठेवला. त्यांचे अनेक शाळा,धर्मशाळा, अंध- पंगु सदावर्ते, गोरक्षण संस्था, आश्रम शाळा, वस्तीग्रह कण्याछत्रे, विद्यालय आहेत शेवटी बाबाचे एकच म्हणणे होते की, दारू पिऊ नका. कोंबड,बकर कापू नका कर्ज काढून संण, वार साजरे करू नका. असा कानमंत्र बाबा आपल्या कीर्तनातून देत होते. बाबाचे अनमोल वचन जनसामान्यांच्या कामी आले. बाबांचे कार्य समाजाला पोषक असे संजीवनी मंत्र देऊन गेले.
असे निष्काम कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी आपले शेवटचे कीर्तन दिनांक 8/ ११ /१९५६ रोजी मुंबई येथे केले. आणि काही दिवसातच बाबाची प्रकृती बिघडली. त्यांना मुंबईच्या जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. व बाबाच्या आग्रहावरून त्यांना अमरावतीला घेऊन गेले. तेथे बाबांना आराम वाटू लागला. परत मला घरी घेऊन चला असा आठहास धरल्याने त्यांना नाईलाजास्तव नगर वाडीला आणले.
परत तब्येत ढासळल्याने अमरावतीकडे गाडीने आणत असताना वलगाव च्या जवळ २० / १२/ १९५६ रोजी रात्री बारा वाजून वीस मिनिटांनी बाबांची जीवनज्योत मावळली आणि संपूर्ण भारत देश एका महान संतास मुकला होता.
“निळ्या, निळ्या आकाशात ! निखळला तारा!!
काळया, काळया अंधारात !झाला शांत वारा!!
हरी म्हणे रुक्मिणीला! डेबू माझा गेला.!!
निष्काम कर्मयोगी !समाधिस्त झाला.!!
तानाजी इबितवार नांदेड.
९६७३२ ४८०६५

