पाडस

शेती करताना शेतीतील पिकांचे रक्षण करावे लागते. शेतकरी बी पेरतो आणि पीक येत. लहान मुंग्या ,जीव जंतू ,विविध प्रकारचे कीटक, उंदीर, मुंगूस ,घुशी ,साप ससे, हरण, रान डुक्कर, चिमण्या, कावळे, पोपट, कबूतर ,कोंगे असे अनेक पशुपक्षी या सर्वांचाच वाटा त्या पिकात असतो शेतकरी कितीही पीक राखला तरी पशुपक्षी त्यांचा हिस्सा उचलतात म्हणून तर त्याला जगाचा पोशिंदा म्हणतात.

मग कधी घरची पाळीव जनावरांना चाराही याच पिकापासून मिळतो. एक जीवन चक्र तयार होते जीव जंतू किडे गोगलगाय, मुंग्या यांना खाण्यासाठी कावळे, कोंगे तसेच पिकांना खाण्यासाठी चिमण्या व इतर पक्षीही पिकामध्ये येतात उंदीर, घुशी यांना खाण्यासाठी साप ,सापाच्या शोधात मुंगूस. ससे, हरणाची पाडस ,डुकरांची पिल्ले हे रानातील कुत्रे तसेच तुरळक प्रमाणात कोल्हे यांचे खाद्य. अस्वल व बिबटे यांचाही दुर्मिळ वावर आमच्या शेतशिवारात आहे.

 

 

 

 

 

 

ज्वारीचे दाणे तांदळाचे दाणे यांना कीटकनाशक किंवा विषारी औषधे लावून ती शेतात पसरून टाकतात त्यामुळे काही कीटकांचा, जीव जंतूचा गोगलगायींचा, नाश होतो त्यांच्यापासून पिकेही वाचतात .

 

 

 

पाखरांना गोफणीच्या मदतीने शेतात येण्यापासून रोखले जातं हरणांना सशांना खुशकावून लावण्यासाठी पाळीव कुत्र्यांची मदत घेतली जाते रानडुक्कर हारणे शेतात येऊ नये म्हणून तारेचे कुंपण पण लावली जाते. या तारेच्या कुंपणात विद्युत प्रवाह सोडला जातो. मुख्यतः रात्री पिकाचे रक्षण करण्यासाठी विद्युत प्रवाह सोडला जातो.

 

 

 

रात्रीचे जेवण झाली होती तसे चार-पाच शेतकरी ठिकाणावर जमा झाले नेहमीच असे चार-पाच शेतकरी समूह करून रात्रीच्या वेळी शेताकडे गस्त घालण्यासाठी जातात पिकांची रक्षण करण्यासाठी हातात काठी असते कारण आमच्या शेत शिवारात दगड सापडत नाही दूर दूर पर्यंत नुसती काळी माती मग रानडुकरे जंगली, कुत्री, कोल्हे साप यांच्या हल्ल्यापासून रक्षण करण्यासाठी ही काठी महत्त्वाची ठरते.

 

 

 

एखादी बॅटरी आणि छोटासा पोंगा आवाज करण्यासाठी त्यांच्यासोबत असते .माझी माणसं जेव्हा मी माझी माणसं म्हणतो ते फक्त माझे सालगडी किंवा नोकरदार नसतात माझ्यावर प्रेम करणारे माझ्यावर विश्वास करणारे मला साथ देणारे या सर्वांना एका व्यापक अर्थाने मी माझी माणसं असा उल्लेख करत असतो.

 

 

 

माझी माणसं मी या शेतकऱ्यासोबत मिसळून रात्रीच्या किर अंधारात बॅटरीच्या उजेडात मार्ग शोधत चालत होतो.अंधारात काजवे चमकत होते आणि हरणांची डोळे काजव्यासारखे भासत होते.

 

 

 

आम्ही शेत शिवारात आलो याची चाहूल कळपाला लागली आणि मग तो कळप दूर पळू लागला . तसे आमच्या लक्षात आलं एका हरणाच्या पाडसाला कुंपणाच्या तारे चा शॉक लागला होता. जागेवर ते खाली पडलं.

 

 

 

आम्ही त्याच्यापर्यंत पोहोचलो बघितले तर ते निरशक्त तर झालं होतं डोळे उघडे होते श्वास चालू होता त्याचा जीव थोडक्यात वाचला होता पण ते आता एकटं पडलं होतं कळपापासून त्याची ताटातूट झाली होती माझ्या माणसांनी त्याला उचललं आणि ठिकाणावर घेऊन आली.

 

 

 

ती रात्र त्याच्यासाठी काळ रात्र होती . पाडस आईच्या विरहान कोमेजून गेल होत. त्याची होणारी धडपड आम्ही बघितली. आम्हीही ती रात्र जागूनच काढली पाणी पाजण्याचा प्रयत्न केला पण काही जमलं नाही .त्यांला वासरांचा हिरवा चारा दिला पण चारा खायचं त्याचं वय नव्हतं .

 

 

 

शॉक पाडसाच्या पायाला लागला तिथे जखम झाली होती. सकाळी जखमेवर उपचार केले आणि काही जानकारांनी गायीचे दूध पाजवण्याचा सल्ला दिला बरेच प्रयत्न केले आणि शेवटी यश आले त्या पाडसानं दुधाचा पहिला घोट घेतला आणि माझ्या जीवात जीव आला.

 

 

 

काही दिवसानंतर त्याची तब्येत सुधारली मनानं ते आम्हाला आपलं मानू लागलं त्याला कुठलंच बंधन आम्ही ठेवलं नव्हतं फक्त त्याच्या संरक्षण माझी माणसं करू लागली आमच्या शेत शिवारात ते आमच्या जनावरांसोबत जायचं आणि जणू काही आपलं घरच आहे असे मानून परत ठिकाण्यावर यायचं तर कधी कधी एकटं ठिकाण्यावर आपल्या तोऱ्यात बसून राहायचं ते आमचं लाडक झालं होतं .

 

 

 

कधी गाईंच्या वासरात , तर कधी मोठ्या बैलात मोठ्या रुबाबात राहायचं .कधी माझ्यासोबत तर ,तर कधी माझ्या माणसासोबत ते पाडस जवळ येऊन बसायचं. आम्ही त्याचं स्वातंत्र्य झोपलो होतो माझ्यासोबत माझ्या शेतशिवारात फिरायचे मनात आलेली पिकं खायचं त्याला कोणीच काहीच म्हणत नव्हतं. त्याला कोणतेही बंधन नव्हतं पण आमच्या प्रेमाचे बंधन ते पाडस मानू लागलं होतं.

 

 

 

माझ्या कुटुंबातही त्या पाडसाची चर्चा व्हायची माझ्या पत्नीला ते पाडस आईविना पोरक झाल्याच वाटायचं आणि त्याला त्याच्या कळपात परत पाठवलं पाहिजे असेही ती म्हणायची. ज्या वळणाचं पाणी त्याच वळणावर जात. हे ही तितकंच खरं. ते पाडस त्याच्या कळपात जाणारच होतं. किंवा जीवन जगण्याचा त्याचा तोच मार्ग होता पण माझं मन काही मानत नव्हतं त्याला परत त्याच्या कळपात पाठवायचे मी काही विशेष प्रयत्न करत नव्हतो.

 

 

 

महिना उलटून गेला होता एका रात्री गलका झाला हरणांचा कळप पिकाची नासाडी करतो हे आम्हाला कळलं काही शेतकरी माझी माणसं लोक सर्व साहित्य सोबत घेऊन शेत शिवारात गेली. मी त्यांच्यासोबत सामील होतो हरणाच्या कळपाला हुसकावून लावलं परत ठिकाण्यावर आलो आणि आम्हाला कळलं ते पाडस आता आमच्या सोबत नाही.

 

 

 

शेतशिवारात आमच्या सोबत आल होत पण ते परतलच नव्हतं. कदाचित त्याच्या त्या कळपात ते परत गेल होत काळजी वाटली आणि दुःखही वाटलं‌‌ त्या पाडसाच्या नसल्याने आज सुन सुन वाटू लागलं.

 

 

 

हरणांच्या कळपाचा शोध घेतला. नक्की ते कळपातच गेलं का याची मला खात्री करून घ्यायची होती कळप दुपारची विश्रांती नदीकाठी पानवट्यावर घेत होता कळपात बरेचसे हरण आणि पाडसे ही होती मी जवळ जाण्याचा प्रयत्न केला तसा कळप सावध झाला आणि माझ्यापासून दूर होऊ लागला चंचल मनाची ही जनावर थोडसं अंतरावर जाऊन कळप थांबलं त्याच्या अलीकडे एक पाडस आणि त्याची आई ही थांबली.

 

 

 

क्षणात वाटलं हे तर आपलं पाडस नसेल का पुढच्या क्षणाला आईला सोडून आमच्याकडे ते पाडस धावत आलं त्याच्या पायाला जखमेची वन मी बघितली आणि त्याला मी ओळखलं. त्याच्या आईला काळजी वाटू लागली होती पण त्याच्यासाठी तर आम्ही त्याचेच जिवलग होतो ते आमच्या जवळ आलं होतं फक्त भेटायला आल्या पावली माघारी फिरलो ते कायमचं त्याच्या कळपात त्याच्या त्या निसर्ग रम्य जीवनात रमण्यासाठी.

 

 

 

अन कायमच्या आनंद आठवणी आम्हाला देऊन गेलं ते पाडस

@ मी एक आनंद यात्री
राजू पाटील लच्छनकर .
मो.६३०४८७३७२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *