पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते होणार जिल्हा कृषि महोत्सवाचे उद्घाटन

 

 

 

हिंगोली, दि. २२ :-  येथील रामलीला मैदानावर दि. २५ मार्च ते २८ मार्च, २०२३ या कालावधीत जिल्हा कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या जिल्हा कृषि महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे कृषि मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते होणार आहे.  या कृषि महोत्सवात आपणास दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी दिले.

जिल्हा कृषि महोत्सव यशस्वी करण्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध समिती व विभागाचा आढावा घेण्यात आला.

 

 

 

 

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे, आत्माचे प्रकल्प संचालक युवराज शहारे, कृषि उपसंचालक शिवसांब लाडके, नोडल अधिकारी जी. बी. बंटेवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. डी. ए. टाकळीकर, शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, सर्व तालुका कृषि अधिकारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी आर. एच. एडके, रेशीम विकास अधिकारी पी. एस. देशपांडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

 

 

            यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्हा कृषि महोत्सवात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम, चर्चासत्र तसेच प्रदर्शन स्टॉल लावणे, अधिकारी, मान्यवरांना निमंत्रण देणे, वाहन व्यवस्था, पार्कींग, प्रदर्शनाच्या ठिकाणी वीज, पाणी, फिरते शौचालय यासह आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देणे आदी बाबींचा आढावा घेतला.

 

 

 

 

तसेच या महोत्सवानिमित्त चार दिवस राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रम, चर्चासत्र, उपक्रमाबाबत सर्व संबंधित समिती सदस्य, अधिकारी यांनी आपणास सोपविण्यात आलेली जबाबदारी वेळेत व यशस्वीपणे पार पाडावी, अशा सूचनाही श्री.पापळकर यांनी  दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *