भारतीय संस्कृतीच एक देन म्हणजे तसफ्या.तसफ्या भारतीय संस्कृतीचा अलंकार ही मी मानतो. मनुष्य हा मूळतः समाज प्रिय आहे त्याला समाजात राहायला आवडते. मानवी संस्कृतीने आपली पाळेमुळे वाढवायला चालू केली असेल अगदी त्यावेळी पासून कदाचित ही तसफ्या ची पद्धत असेल किंवा तसफ्या च अस्तित्व असेल.

अति प्राचीन काळापासून चालत आलेल्या या तसफ्याला विविध भागात विविध नावाने ओळखले जाते जसे पंचायत, लावाद ,किंवा नवीन युगात कॉम्प्रमाईज. जेव्हा दोन व्यक्ती किंवा दोन वेगवेगळे गट ,दोन वेगवेगळी कुटुंब किंवा गाव कोणत्यातरी मुद्द्यावर एकमेकांच्या विरोधात भांडायला तयार होतात तेव्हा काही जानकारी मंडळी मध्यस्थी करून केवळ चर्चा करून हे वाद संपतात ते म्हणजे तसफ्या.
भारतीय संस्कृतीमध्ये अनेक वर्षे घरातले ,गावातले वाद, गावातच मिटवायचे अशीच पद्धत होती. याला समाज मान्यता आणि त्या त्या वेळच्या सत्ताधाऱ्यांची राज मान्यता ही होती. गावातील जाणकार , वडीलधारी मंडळी ,प्रतिष्ठित मंडळी एकत्र बसायचे दोन्ही पक्षांचा बाजू ऐकून घ्यायचे आणि हे सर्व कारवाई गावातील इतर लोकही ऐकायचे त्यामुळे येथे पक्षकारांना जास्त खोटे बोलता येत नव्हते जर कोणी खोटं बोलण्याचा प्रयत्न केला तर कुणीतरी लगेच त्याची दुरुस्ती करायचा पण काळओघाने हे हळूहळू बंद पडत गेलं गावातील प्रकरण कोर्टात जाऊ लागली आणि दुर्दैवाने आपली न्यायदेवता आंधळी आहे.
कोर्टात न्याय मिळणे ही काही सोपी गोष्ट नाही. महाराष्ट्राचे लाडके माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांनी याच गावातील पंचायतीला, तसफ्याना कायदेशीर रूप देण्याचा प्रयत्न तंटामुक्ती अभियानातून केला. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन टी रामाराव यांनी गावातील वाद गावकरी मंडळींनी मिटवल्यास ते पोलिसांना बंधनकारक असल्याचा सूचना दिल्या होत्या आणि आजही तेलंगणात तीच परंपरा चालू आहे.
सुरुवातीपासूनच मला अशा तसफ्या त्यामध्ये बोलावन यायचं नंतर तीन गावचा पंचायत समिती सदस्य म्हणून अनेक तसफ्यामध्ये हजरी लावण्याची संधी मिळाली. एकदा का तसफ्या मध्ये ठरलं की ते मग सर्वांना बंधनकारक असतं याची माहिती ही बऱ्याचदा पोलिसांना दिली जाते .वाद मिटले तर पोलिसांचे कामही सोपे होते आणि समाजात शांती प्रस्थापित व्हायला मदत होते.

पण कधी कधी काही प्रसंगात सारं शहाणपण चुलीत जातं आणि मानवी भावनांच्या ताब्यात माणसाचं मन व बुद्धी जाते. फार अपवादात्मक परिस्थितीत तसफ्या तोडला जातो आम्ही गावकरी मंडळींनीही एका प्रसंगात तसफ्या तोडला तोच प्रसंग सांगण्याचा प्रयत्न करतो.
आज महाशिवरात्र होती महाशिवरात्रीला बाराबिग्यातील होळाकाठच्या महादेवाचा परु होता. मला जरा उशीर झाला मी जेव्हा तेथे पोहोचलो तसा महाप्रसादाचा कार्यक्रम संपत आला होता मी प्रसाद घेतला तशी गावाकडील मंडळींनी मला त्यांची नाराजी सांगितली .तुम्ही रात्री परूची तयारीला नव्हता आणि सकाळी ही उशिरा आलात त्यांना माझी अडचण सांगत मी त्यांचा निरोप घेतला.
ऊन तापू लागलं होतं मी आणि माझी माणसं बारा बिग्यातल्या त्या नदीकाठच्या शिवारातून बाहेर पडत कोंडाबाईची लवण ओलांडून आमच्या शेत शिवारात आलो तसेच माझ्या लक्षात आले श्रीपत आमच्या सोबत चालत होता आणि त्याला मला काहीतरी बोलायचे आहे. तसा मी एका लिंबाच्या झाडाखाली विसावलो आणि माझ्यासोबत श्रीपत आणि माझी माणसं माणसंही त्या लिंबाच्या थंडगार सावलीत विसावली.
अन चर्चा सुरू करावी म्हणून मी म्हणालो काय म्हणते श्रीपत नात. श्रीपत म्हणाला दादा तुमच्यापेक्षा मी काही फार मोठा नाही लग्न लवकर झालं आणि आजोबा झालो बघ. समद चांगल आहे पण हे बाराबेडी पोरीचं लय जीव खाऊ लालय. मी मिश्किल पणे हसत माझ्या माणसापैकी एक व्यंकटराव कडे बघितलं तसे व्यंकटराव म्हणाले बाराबेडी हो, जावई. माझ्या माणसांपैकी एक असणारे व्यंकटराव म्हणाले हे बघ श्रीपत तुझी ही गलती हाय ज्याची वस्तू त्याला द्याव. श्रीपत म्हणाला जमीन मुलीला दिलो जावयाला विकून खायला नाही.
व्यंकटराव रागात म्हणाले अरे हुंड्यात जमीन दिलास आता त्यांना विकू दे किंवा ठेवू दे आपल्या ला काही म्हणता येत नाही मी म्हणालो श्रीपत बाईलिकेचा मामला आहे काहीतरी करून मिटवुन टाक तसाच श्रीपत म्हणाला काही नाही दादा पहिलं वाटायचं जमीन विकू नये म्हणून पण आता जमीन विकून देतो त्याला पैसे. काय करू त्याची मर्जी .जावई प्यायला शिकला आणि सगळा हेंडगा लागला.श्रीपत जमीन विकण्याच्या प्रयत्नात होता पण जमिनीचा काही सौदा होत नव्हता इकडे जसा उशीर होऊ लागला तसा श्रीपतच्या मुलीचा जाच वाढू लागला आणि त्यात आता मुलीची सासू ,ननंद ,सासरा सगळेच सामील होते.
गरीबाच लेकरू ते असाह्य वेदना सोसू लागलं अधून मधून बापाला फोन करून ती सांगत होती काही करा यांच्या पैशाची व्यवस्था करा. श्रीपतचा जीव कासावीस होत होता पण भाऊ भावकीचा मामला .जमीन काही विकल्या जात नव्हती आणि एके दिवसी श्रीपतच्या लेकीचा संयम संपला त्या बेबस, असह्य, जीवनाचा तिने त्याग केला फाशी घेऊन स्वतःला या जाचातून मुक्त केलं.
त्यादिवशी माझा मुक्काम ठिकाणावरच होता मला जाग आली होती पण मी अंथरून सोडलं नव्हतं सकाळच्या कामात माझी माणसं व्यस्त होती तसा व्यंकटराव माझ्याकडे आला त्याला काही शब्द फुटेना फक्त डोळ्यात अश्रू होते मी म्हणालो माझी छाती फुटली व्यंकटराव काहीतरी बोला कधीच डोळ्यात पाणी न येणाऱ्या दगडासारख्या वेंकटराव आज कोसळला होता फार मनातून हादरुन गेला होता. दुःख आवरत म्हणाला रामपाऱ्यात श्रीपतच्या पोरीने फाशी घेतली तसा तिचा जीव क्षणातच गेला.
गावात झुंझुरक्यात ही वार्ता कळली तसा मी तुमच्याकडे आलो.
ही वार्ता ऐकताच माझी माणसं हातातलं काम सोडून माझ्या भोवती जमा झाली. हा हा म्हणता गाव एक झाला होता आणि माणसाचा जमावडा माझ्या ठिकाण्यावर जमत होता. दोन पार्टी आमचे गाव सुख दुखात आणि संकटात एक होतं तसेच आजही एक झालो होतो. श्रीपतच्या घराकडे आम्ही निघालो तसा बराच जमाव त्याच्या घराजवळ जमला होता.
त्या दुःखी कुटुंबाला सोबत घेऊन ज्याला जसे जमलं तसं कोणी मोटरसायकल ,ऑटो ,ट्रॅक्टर ,कार घेऊन त्या अभागी लेकीच्या शेवटच्या दर्शनाला सार गावच घंटाभरात तिच्या गावात पोहोचला पण तिच्या घरात तिचा मृतदेह नव्हता पोलिसांनी पुढील कारवाईसाठी तो दवाखान्यात नेण्यात आला होता आणि तिच्या सासरच्या मंडळींना पोलीस स्टेशनमध्ये जेरबंद करण्यात आलं. आम्ही गावकरी मंडळी तो सरकारी दवाखाना गाठला पोलीस बंदोबस्त होता आम्ही काही अंतदर्शन घेऊ शकलो नाही
वातावरण चिगळू लागलं हे बघून पोलिसांनी मध्यस्थी करत तसफ्या करण्याचा सल्ला आम्हा गाववाल्यांना दिला. श्रीपतच्या मुलीच्या गावातील काही मंडळी आणि आमच्या गावातील काही मंडळी आणि पोलीस प्रशासन यांच्या तसफ्याची बोलणी सुरू झाली मी लोकप्रतिनिधी या नात्याने त्यात सामील होतो. गावातील जमाव पोलीस स्टेशनच्या बाहेर होता त्यांच्या भावना उग्र होत्या. बोलणीच्या दरम्यान जमावत सामील गावकऱ्यांनी मला बोलावलं आणि सांगितलं जे काही घ्यायचा आहे ते नगदी रक्कम घ्या. मला काही शंका आली नाही.
श्रीपतच्या नातीचा सांभाळ श्रीपतनी करावा तिला तिच्या आईची जमीन श्रीपतने द्यावी. श्रीपतच्या मुलीच्या सासरकडील लोकांनी एक रक्कम नगदी स्वरूपात श्रीपतला द्यावी. हे तसफ्यात ठरलं . ती रोख रक्कम त्या गाववाल्यांनी दिलीही. अंत्यविधी श्रीपतच्या मुलीच्या गावात करावा हे ठरलं. ठरल्याप्रमाणे अंत्यविधी झाला आणि वेगळीच गडबड सुरू झाली. गावातील काही पोर श्रीपतच्या मुलीच्या घराकडे चाल करू लागली तसा मी एका मोटरसायकलवर बसून तेथे हजर झालो गावातील पोरांचा आज वेगळा बेत होता .
ही पोर ट्रॅक्टर मध्ये घुसे फावडे काट्या लाट्या घेऊन तेथे दाखल झाली होती काहीतरी विपरीत होईल म्हणून मी आणि काही जाणकार मंडळी त्यांना रोखत होतो पण आज कोणांचच मन मानत नव्हतं आमच्या बाईलिकेचा जीव गेला होता. व्यंकटराव माझ्या बाजूला थांबून होता जमाव वाढत होता तसा श्रीपत आपल्या नातीला कवटाळून रडत होता मी त्याच्याकडे नजर केली तसं त्याचा तोल गेला आणि हरामखोरांनी माझ्या पोरीचा जीव खाल्ला असा म्हणत हंबरडा फोडला.
बेबस लाचार बापाच्या डोळ्यातील अश्रू मुळे जमावाच्या संयमाचा बांध तुटला तसा व्यंकटराव म्हणाला बघता काय फोडा साल्यांना घरदार जमीन दोस्त करा. मी काही विरोध करेल म्हणून काही मंडळी वाट बघत होते पण माझं निशब्द राहण्याचा भाव त्यांनी ओळखला आणि अचानक त्या जमावाने श्रीपादच्या मुलीच्या घरावर हल्ला केला अक्षरशः त्याच्या घरातील मंडळीवर हा जमाव तुटून पडला त्यांचे हात पाय तोडले तर काहींचे डोके फोडले श्रीपादच्या मुलीच्या घरची मंडळी जखमी अवस्थेत घर सोडून पळून गेली आणि त्या जमावत ते घर जमीनदोस्त केलं.
या सर्व घटनेची व्हिडिओ शूटिंग मोबाईल मध्ये काही लोकांनी केली त्या आधारे आमच्यावर गुन्हेही दाखल झाले आमचा राग काढून आम्ही जमावसह परतत होतो तेव्हा त्या गावातील काही बुजुर्ग मंडळी मला म्हणाली पाटील पहिल्यांदा तसफ्या तोडल्या तुमच्या गावान हे बरं नव्हे. मी म्हणालो मामा जीवन जगण्यासाठी किंवा जीवन फुलवण्यासाठी तसफ्या करतात. जिथे जीवन संपते तिथे काय अर्थ आहे या तसफ्याला.

