एक गोड स्वप्न

 

 

 

सतरा वर्षांपूर्वी मी विवाह बंधनात अडकलो. माझ्या जीवनात माझ्या पत्नी सुमतीने प्रवेश केला. माझ्या पत्नीचे वडिलांचे निधन माझ्या लग्नापूर्वी च झाले. सर्व काही करणारे माझे मेहुणे रघुनाथराव पाटील व त्यांची पत्नी यशोदा पाटील. रघुनाथ पाटील पदवीधर तर यशोदा पाटील यांचे शिक्षण पुण्यात झालेलं पण संसाराच ओझं त्या तरुण वयात या दोघांवर पडलं त्यांना या प्रापंचीक कटकटी शिवाय काही करता आलं नाही.

घरातील सर्व मंडळी त्यांचे सेवा करण , चार बहिणी पैकी तीन बहिणीचे लग्न करण, तीन गावातली जमीनच नव्हे तर वतनदारी सांभाळून तीन मुलांचे शिक्षण पूर्ण करणे हे काही सोप नव्हत.

 

 

 

 

माझ्या लग्नात आई-वडिलांच्या कुशीत दडणारी ती तीन गोंडस ,लाजाळू ,विनम्र मुलं केव्हा मोठी झाली कळलं च नाही. शेखर, गोपीनाथ आणि आनंद या तिघांनी उच्च शिक्षण घेतलं त्यापैकी शेखर आणि गोपीनाथ हे विदेशात नोकरी करू लागले आणि आनंद भारतात.

 

 

 

 

 

आणि मग शेखर साठी वधू शोधण्याचा प्रयत्न आई-वडिलांनी सुरू केला. एके दिवशी मी माझ्या शेत शिवारा च्या कामात असताना माझे मेहुणे
फोनवर माझ्याशी बोलत होते आणि मला सुखद आनंदाचा धक्का बसला. मग थोडसं मी घाबरलो आहे कारण स्थळ तसं होतं.

 

 

 

 

 

 

चव्हाण नायगावकर कुटुंबातील मुलीच्या विवाहाचा तो प्रस्ताव होता. नांदेड जिल्ह्याचा मी रहिवासी असल्यामुळे या कुटुंबाशी अप्रत्यक्षरीत्या जोडला गेलेलो होतो. मला त्यांच्या राजकीय, सामाजिक ,कौटुंबिक भव्यतेची माहिती होती. तिथे नकार देण्यासारखं काही नव्हतं पण आजकालच्या नवीन पिढीतील मुलांच्या अज्ञानामुळे जर मुलांन पोरकटपणा केलं तर ते मला पटणारं नव्हतं.

 

 

 

 

 

तो योगच जुळून आला होता दोन्ही कुटुंबाची तसेच मुला मुलींची पसंती जुळली होती आणि मग ७ मे २०२३ ला लग्नाचा मुहूर्त ठरला. या विवाहाच्या कारणामुळे मी प्रत्यक्ष पहिल्यांदा चव्हाण नायगावकर कुटुंबीयांच्या प्रेम, आपुलकी ,एकमेकांमध्ये असलेला संपर्क ,कार्यक्रमाला असलेली सर्वांची उपस्थिती, पाहुण्यांचा मानसन्मान, रितरीवाज या आजच्या जगात दुर्मिळ झालेल्या भावबंधांना अनुभवत होतो.

 

 

 

 

माननीय माजी आमदार वसंतराव चव्हाण साहेब, नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष ज्यांनी दोन वेळा विधानसभेत आणि दोन वेळा विधान परिषदेमध्ये आमदार या नात्याने महाराष्ट्राची सेवा केली.

 

 

 

 

 

नांदेडचे माजी महापौर आनंदराव चव्हाण नायगाव नगरीचे दोन वेळेस चे नगराध्यक्ष श्रीनिवासराव चव्हाण नायगाव नगरीचे सध्याचे नगराध्यक्ष विजय चव्हाण तसेच तरूण वयात राजकीय क्षेत्रात सहभाग नोंदवणारे रवींद्र चव्हाण याचप्रमाणे इतर क्षेत्रात काम करणारे धनंजय चव्हाण,सुधाकरराव चव्हाण, हनुमंतराव चव्हाण ,डॉक्टर विश्वासराव चव्हाण , श्रीधर चव्हाण हे सर्वच बंधू हा भव्य दिव्य विवाह

सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रयत्न करत होते. चव्हाण नायगावकर कुटुंबावर प्रेम करणारे नातेवाईक सहकारी मंडळी मित्रमंडळी सर्वांच सहकार्य या विवाह सोहळ्यात मिळत होत. श्रद्धा श्रीनिवास राव चव्हाण व श्रेया श्रीधर चव्हाण या दोन भगिनींचा हा एकत्रित विवाह सोहळा होता.

 

 

 

 

 

मुलाकडील पाहुण्यांची व्यवस्था श्रीकांत चव्हाण तसेच सर्वच नवीन पिढीतील तरुण बंधू बघत होते. चव्हाण नायगावकर कुटुंबातील महिला विवाह प्रसंगातील विधी व संस्कार हे विधिवद पार पाडण्यात मग्न होत्या.

 

 

 

 

केशवराव चव्हाण या कुटुंबातील सर्वात थोरले बंधू या विवाह सोहळ्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत होते. या कुटुंबातील लहान मुलं या संपूर्ण विवाह सोहळ्याचा मनमुराद आनंद लुटत होती हसत बागडत होती. आयुष्यात पहिल्यांदाच मी चार पिढ्यातील सर्वच पुरुष, महिला, तरुण, वृद्ध, बालवयातील लेकरं हे

 

 

एकत्रपणे या आनंद सोहळ्यात सहभागी झाले होते. याविषयी माननीय वसंतराव चव्हाण साहेब यांच्याशी माझी चर्चा झाली तेव्हा त्यांनी मला हे सर्व काही ईश्वरी आहे असे सांगितले ‌.

 

 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब तसेच राजकीय क्षेत्रात विविध पदावर काम करणारे अनेक दिग्गज मंडळी, नायगावकर चव्हाण, पाटील हुसेन नगरकर तसेच धर्माधिकारी बरबडेकर यांच्या नातेवाईकांची मित्र परिवाराची उपस्थिती होती.

 

 

 

 

 

 

अन्नदान ही तर चव्हाण नायगावकर यांच्या कुटुंबाची एक उच्च परंपरा. याच परंपरेला शोभेल अशीच भोजन व्यवस्था या विवाह सोहळ्यास उपस्थित राहणाऱ्या प्रचंड मोठ्या अशा जनसमुदायाची केलेली होती.

 

 

 

प्रचंड अशा मोठ्या व्यासपीठावर या दोन्ही वधू-वरांचा विवाह सोहळा मंगळाष्टका पार पडल्यावर नवरी श्रेया व नवरदेव शेखर पाटील यांच्या शेजारी त्यांचे आई यशोदा आणि वडील रघुनाथ पाटील हे उपस्थित होते. त्याच व्यासपीठावर माझी पत्नी सुमती तिचे बंधू रघुनाथ पाटील यांच्या शेजारी उपस्थित होती. आणि त्या भावा बहिणीचा संवाद माझ्या कानावर पडत होता.

आयुष्यभर वडीला प्रमाणे वागणारा तो भाऊ लहान बहिणीस म्हणत होता मी जे हे विवाह सोहळ्याचे दृश्य बघतो हे स्वप्न तर नाही ना. त्यांचे ते बोल माझ्या संवेदनशील मनाला भावविवश करत होते.

 

 

 

 

वधू पिता श्रीधरराव आपल्या मुलीला सासरी पाठवताना त्यांच्या डोळ्यातले अश्रू त्यांचं मुलीवरील अतोनात असलेले प्रेम सिद्ध करत होते ‌. या सर्वच आनंदी क्षणांचा भावनिक क्षणांचा दिग्गज लोकांच्या सहवासाचा मी एक आनंद यात्री म्हणून आनंद घेतला.

 

 

 

 

 

रघुनाथरावांच्या त्या शब्दांना ,हे स्वप्नवत तर नाही ना. माझ्याकडे एकच उत्तर होतं हे स्वप्न होत नाही प्रत्यक्षात हे घडलेला आहे पण अजून मन मानायला तयार नाही.
हे आम्हा सर्वच नातेवाईकांना पडलेले एक गोड स्वप्नच होत.

 

  @मी एक आनंदयात्री
  राजू पाटील लच्छनकर

📞६३०४८७३७२४ 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *