देगलूर प्रतिनिधी,दि.०२ :- देगलूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ यांनी पदवी प्रथम वर्षात द्वितीय भाषा मराठी शिकत असलेल्या विद्यार्थ्यांशी नवीन शैक्षणिक वर्षाच्या निमित्ताने संवाद साधला. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर
मार्गदर्शन केले. “प्रत्येक व्यक्तीला निसर्गाने बुद्धी दिलेली आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यात काही ना काही सुप्त क्षमता दडलेली असते. तिचा शोध घेऊन विकसित करणे हे प्रत्येक विद्यार्थ्याचे कर्तव्य आहे. त्यासाठी प्रचंड जिद्द आणि आत्मविश्वासाची

आवश्यकता असते. तरच या स्पर्धेच्या युगात विद्यार्थी टिकू शकतो. स्पर्धात्मक परीक्षेच्या तयारीसाठी देगलूर महाविद्यालयात सर्व सुविधा उपलब्ध आहेत. त्या सर्व सुविधांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. वर्गात नियमितपणे उपस्थित राहून अभ्यास
करावा. स्वतःबरोबर राष्ट्राची प्रगती साधावी.” असे प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले. या मार्गदर्शन सत्रास मोठ्याप्रमाणात विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

