किनवट मधील सुभाष नगर बनले डासांचे माहेरघर ?

किनवट प्रतिनिधी,दि.२७ :   सुभाष नगर येथे डेंग्यूचे प्रमाण जास्त असल्याचे  कारण   नगर च्या बाजूला  साचलेले हे पाणी डेंगू मच्छर यांचे माहेरघर आहे असे त्या भागातील नागरिक म्हणतात याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की.
किनवट मध्ये डेंग्यूने  थैमान घातले आहे दवाखाणे रुग्णांनी भरून गेले आहेत यात किनवट येथील वार्ड क्रमांक १७  सुभाष नगर येथील साचलेले पाणी बनले आहे मच्छर यांचे माहेरघर लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्याकडे लक्ष देत नसल्याने आणि नगरपालिकेचे लक्ष्य याकडे नसल्यामुळे सुभाष नगर येथे जास्तीत जास्त डेंग्यूचे रुग्ण आढळतात लहान मुले वयस्कर यांचे प्रमाण डेंग्यूच्या आजारात जास्त आढळून येते किनवट नगरपालिका हे फक्त ठेकेदारांच्या भरोशावर आहे कोणीच लक्ष देत नाही आणि कुणी येऊन पाहण्यास पण तयार नाही सुभाष नगर येथील रहिवासी याबद्दल तीव्र संताप व्यक्त करत आहेत तरी नगरसेवक व नगरपालिका किनवट यांनी याची दखल घ्यावी अशी विनंती सुभाष नगर येथील रहिवासी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *