देगलूर महाविद्यालयात निबंध स्पर्धा संपन्न.

 

देगलूर प्रतिनिधी:- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्त महाराष्ट्र शासनाने दिनांक 08 एप्रिल 2026 ते 14 एप्रिल 2026 हा कालावधी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले आहे. त्यानिमित्ताने अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालय देगलूर राज्यशास्त्र विभागाच्या वतीने दिनांक 09/04/2026 रोजी चवदार तळ्याचा सत्याग्रह आणि मानवी हक्क या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

 

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 रोजी महाड येथील चवदार तळ्याचे पाणी सर्वाना पिण्यासाठी मिळावे यासाठी बहुसंख्य बांधवाच्या उपस्थित चवदार तळ्याचा सत्यागृह केला. म्हणून भारतात 20 मार्च हा दिवस सामाजिक सबलीकरण दिन म्हणून साजरा केला जातो.

 

 

पाणी हे निसर्गाने मानवास दिलेले वरदान आहे. ते सर्वाना मिळाले पाहिजे. या नैसर्गिक न्याय व मानवी हक्काच्या संरक्षणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आजपासून 100 वर्षांपूर्वी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला.

 

 

या सत्याग्रहास 100 वर्ष पूर्ण झाली. 21 व्या शतकातील पिढीला आपला देश, भारतीयांचे हक्क व त्याच्या संरक्षणात महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान किती महत्वाचे आहे याची जाणीव व्हावी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्य आणि विचार करण्याची क्षमता अधिक विकसित व्हावी या हेतूने राज्यशास्त्र विभागाच्या वतीने निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या निबंध स्पर्धेत जवळपास 75 विध्यार्थ्यानी आपला सहभाग नोंदवला.

 

 

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मोहन खताळ, उपप्रचार्य डॉ अनिल चिद्रावार, डॉ. चमकूडे एम. एम., डॉ. शेरीकर व्ही. जी., पर्यवेक्षक प्रा. संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाने ही निबंध स्पर्धा संपन्न झाली.या निबंध स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रत्नाकर लक्षटे, डॉ. माधव चोले, प्रा. सोनकांबळे मल्हारी, प्रा.शिवानंद सूर्यवंशी, प्रा. संतोष वानोळे व सर्व वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केल्यामुळे ही निबंध स्पर्धा यशस्वीरीत्या संपन्न झाली. या निबंध स्पर्धेत कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी अधिक संख्येने उपस्थित होते.