नांदेडहून अमरनाथ यात्रेसाठी १०० भाविकांचा पहिला जत्था ३ जुलैला रवाना.

नांदेडहून अमरनाथ यात्रेसाठी १०० भाविकांचा पहिला जत्था ३ जुलैला रवाना.

धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली २७ व्या यात्रेची सुरुवात; सकाळी १० वाजता रेल्वे स्थानकावर निरोप समारंभ.

नांदेड प्रतिनिधी : धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली २७ व्या अमरनाथ यात्रेसाठी १०० भाविकांचा पहिला जत्था शुक्रवार, दि. ३ जुलै रोजी नांदेडहून रवाना होत आहे. यानिमित्त सकाळी १० वाजता नांदेड रेल्वे स्थानकावर यात्रेकरूंना शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अमरनाथ यात्री संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

 

दि. ३ ते १५ जुलै या १३ दिवसांच्या यात्रेदरम्यान भाविक अमरनाथ, वैष्णोदेवी, अमृतसर, श्रीनगर, दिल्ली, जम्मू, गुलमर्ग, सोनमर्ग आणि अटारी बॉर्डर या प्रमुख धार्मिक व पर्यटनस्थळांना भेट देणार आहेत. “ना नफा, ना तोटा” या तत्त्वावर गेल्या २६ वर्षांपासून ॲड. दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो भाविकांनी अमरनाथ यात्रा यशस्वीपणे पूर्ण केली आहे.

 

 

 

यात्रेदरम्यान भोजन व अल्पोपहाराची व्यवस्था विविध लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक आणि दानशूर व्यक्तींनी केली असून यात्रेकरूंसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

 

 

 

हिमालयातील खडतर समजल्या जाणाऱ्या या यात्रेसाठी सर्व यात्रेकरूंनी गेल्या तीन महिन्यांपासून नियमित वॉकिंग, जिम आणि प्राणायामाचा सराव करून शारीरिक तयारी केली आहे. यात्रेकरूंना निरोप देण्यासाठी विविध राजकीय, सामाजिक व धार्मिक संघटनांचे पदाधिकारी, अमरनाथ यात्री संघ, लायन्स क्लब, एन्जॉय स्विमिंग ग्रुप, हॅपी बीसी ग्रुप, विश्व हिंदू परिषद तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे नांदेडकरांनी मोठ्या संख्येने रेल्वे स्थानकावर उपस्थित राहून यात्रेकरूंना शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

विशेष:

अमरनाथ यात्रेचा दैनंदिन रोमांचकारी वृत्तांत “अमरनाथच्या गुहेतून” या सदराखाली दररोज दुपारी २ वाजेपर्यंत प्रसारमाध्यमांना उपलब्ध करून देण्यात येणार असून तो नियमित प्रसिद्ध करावा, अशी विनंती अमरनाथ यात्री संघाने केली आहे.