आजादी का अमृत महोत्सवानिमित्त “फिट इंडिया फ्रीडम रन”चा शुभारंभ

हिंगोली प्रतिनिधी, दि. ०४ : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा प्रशासनाच्या वतीने दि. 02 ऑक्टोबर, २०२२ रोजी हिंगोली येथील जिल्हा परिषद प्रशाला येथे सकाळी ७.३० वाजता फिट इंडिया फ्रीडम रन ३.० कि.मी. धावण्याचा शुभारंभ निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी नगरसेवक उमेश गुठ्ठे, हिंगोली जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव रमेश गंगावणे, हिंगोली जिल्हा सायकल असोसिएशनचे सदस्य सचिव शिवाजी इंगोले, कराटे प्रशिक्षक गोपाल इसावे, भारत स्काऊट गाईडचे जिल्हा संघटक जयवंता असोले, क्रिकेट प्रशिक्षक नफीस पहेलवान, मैदानी प्रशिक्षक रशीद मास्टर, गजानन आडे, रामप्रसाद व्यवहारे, शासकीय, निमशासकीय कर्मचारी, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, स्काऊट गाईड, नेहरु युवा केंद्राचे युवक, एनएसएसचे विद्यार्थी, महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी, राज्य राखीव बल गटाचे जवान, पोलीस जवान, जिल्ह्यातील विविध खेळांच्या संघटना, योग विद्याधाम व पतंजली योग समिती, नागरिक, खेळाडू उपस्थित होते.

शासनाच्या प्राप्त निर्देशानुसार जिल्हा क्रीडा अधिकारी संजय मुंढे यांनी दि. ०२ ऑक्टोबर, २०२२ रोजी Plog Run आयोजित करुन स्वच्छता आणि तंदुरुस्ती अशा दोन्ही बाबी साधावयाच्या आहेत. धावतांना, जॉगिंग करतांना रस्त्यात दिसणारा हाताने उचलता येईल असे कागदाचे कपटे, कचरा उचलून कचऱ्याच्या पिशवीत / Garbage Bag मध्ये गोळा करुन स्वच्छता करावयाची आहे. सहभागी झालेल्या व्यक्तींनी धावलेले, चाललेले अंतर, मॅरेथॉन फिट इंडिया पोर्टलवर (www.fitindia.gov.in) नोंद करावी.

उपरोक्त डाटा स्वतंत्रपणे वरील संकेतस्थळावर मोबाईलव्दारे किंवा इतर अॅपव्दारे अपलोड करावा. वरीलप्रमाणे माहिती अपलोड केली असता यामध्ये सहभागी झाल्याचे प्रमाणपत्र इमेलव्दारा आपणास प्राप्त होणार आहे.

 

 

 

 

 

फिट इंडिया मिशनव्दारा संघटक आणि व्यक्तींना सामाजिक अंतर राखण्याचे निकषानुसार दि. ०२ ऑक्टोंबर ते ३१ ऑक्टोंबर, २०२२ या कालावधीत धावणे चालण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. फिटनेस का डोस आधा घंटा रोज हा उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक व्यक्तींनी कमीत कमी ३० मिनिट व्यायाम करावा, याबाबत मार्गदर्शन केले.

धावणे हे मानवी शरीराचे सर्वात मोठे स्वातंत्र्य आहे. त्यास नेहमी तंदुरुस्ती (फिटनेस) नियमित व्यायामाची आवश्यकता असते.

नियमित व्यायामासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आणि सर्वांना लठ्ठपणा, आळस, तणाव, चिंता, आजार इत्यादीपासून मुक्त होण्यासाठी मदत करण्यासाठी फिट इंडिया अंतर्गत फिट इंडिया फ्रिडम रन ३.० कि.मी. धावणे ही चळवळ दि. ०२ ऑक्टोंबर, २०२२ या कालावधीत जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

या उपक्रमामागील संकल्पना अशी आहे की, तुम्ही कोठेही चालू शकता कधीही पळु शकता. प्रत्येक जन धावण्यासाठी, चालण्यासाठी आपल्या आवडीचा मार्ग व्यक्तिशः अनुकूल वेळ निवडु शकतात.

आवश्यकतेनुसार काही मिनिटांची विश्रांती घेउनही धावणे चालणे करु शकणार आहात.

प्रत्येकास स्वतःच्या वेगाने धावणे चालण्यासाठी मूभा असणार आहे. स्वयंचलितपणे किंवा कोणत्याही ट्रॅकिंग अॅप किंवा जीपीएस घड्याळाचा वापर करुन धावलेल्या, चाललेल्या अंतराचा मागोवा घेता येणार आहे. त्यासाठी या उपक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व जनतेसाठी www.fitindia.gov.in  ही लिंक उपलब्ध आहे.

या उपक्रमामध्ये दि. ०२ ऑक्टोंबर ते ३१ ऑक्टोबर, २०२२ या कालावधीत हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी संजय मुंढे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *