तात्पुरते मुत्तवली मिर्झा शौकतबेग यांची विरासत नामंजूर करुन प्रशासक नेमणूक करा.
इनामी सातबारा मधून नावे कमी झाली कार्यवाही कधी…?
१९९५ पासून आजपर्यंत तात्पुरतेच पत्र दाखवून प्रशासनची दिशाभूल
बिलोली प्रतिनिधी,दि.०४:- बिलोली येथील वक्फ संस्था मस्जिद-ए-कला टोंब नवाब सरफराज खॉन शहिद मखबरा झुंजागंन नकारखाना कब्रस्तान च्या सर्वे क्रं.५७७,५८० ची विरासत संबंधी प्रकरण सध्या येथील उपविभागिय कार्यालयात प्रलंबित आहे.
सदरिल दर्गाचे तात्पुरते मुतवल्ली मिर्झा शौकतबेग व मस्जिद चे मुतवल्ली यांची फाईल रद्द करुन प्रशासकाची नियुक्ती करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे उपविभागिय अधिकारी बिलोली यांच्याकडे करण्यात आली.

येथील निजामकालीन मस्जिद व दर्गा आहे.याची देखरेख,साफसफाई,स्वच्छता,दिवाबत्ती,पिण्याचे शुध्द पाणी सह नमाजचे पठण,अरबी खायदा पठण,मोज्जन व पेशमाम यांची पगार,त्यांची नियुक्ती येथील कमिटी व मुसल्लीयान हे करत आहे.त्यामुळे नमाज पठणला येणाऱ्या नागरीकांची,मुसल्लीयान यांची अत्यंत गैरसोय होत असुन यावर प्रशासकाची नेमणुक केल्यास या ठिकाणी सर्व सोयी सुविधा नागरिक,श्रध्दालू व मुसल्लीयान यांना उपलब्ध होतील.
नांदेड-हैद्राबाद हायवे रोडलगत वक्फ मंडळ औरंगाबाद यांच्या मालकीच्या असलेल्या ईनामी खिदमत मास जागेत वक्फ मंडळाची कोणतीही पूर्व परवानगी न घेता बेकायदेशिर रित्या भुखंड माफीया यांना हाताशी धरुन या ईनामी जागेवर अनाधिकृतपणे अतिक्रमन करुन टिन शेडचे दुकाने भाडेतत्वावर देण्यात आले आहे.तसेच यासोबत शौकत फक्शंन हॉल थाटुन प्रशासनाची फसवणूक केलेली आहे.मस्जिद व दर्गाचे शौकत बेग,अजिज बेग व ईतर बोगस व व्यक्ती हे आम्हीच खरे मुतवल्ली आहोत असे आतापर्यंत सांगत आले आहेत.
पण एकाची हि विरासत मंजूर झाली नाही.या लोकांनी,तात्पुरत्या मुतवल्लींनी गेल्या अनेक वर्षापासून कागदी घोडे नाचवून सदरील विरासत च्या फाईल मध्ये खोटे व दिशाभुल करणारे दस्ताऐवज,कागदपत्रे देऊन प्रशासनाची दिशाभूल करीत वेळ वाया घालत आहे.यामुळेच तर सदरिल ईनामी देवस्थान च्या वादग्रस्त जागेवर दहा वर्षापूर्वी बिलोलीच्या तत्कालीन तहसिलदारांनी प्रशासक नेमण्याची देगलूर चे तत्कालीन उपविभागिय अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता.पण त्यावर अद्यापही कोणतिही कारवाई झालेली नाही.प्रशासनाने मा.कर्नाटक न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे अवलोकन करुन येथील ईनामी खिदमते मास च्या जागेवर लवकरात लवकर प्रशासकाची नेमणूक करण्यात यावी .
अशी प्रमुख मागणी एजाज फारुखी,अब्दुल रशिद, मुजफरोद्दीन,रफिक ईनामदार,म.खय्युम पटेल शेख.गौस मुस्तफा आदिंनी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे.


