निरागसता बालमनाची ….

 

भारतात तसे मुख्यत ऋतू ३ असतात पण बंगलोरला वर्षभरात जास्तकरून २  ऋतूचेच राज्य असते पावसाळयातील हिवाळा आणि हिवाळ्यातील पाऊस😂..

आमच्या घरापासून अथर्वच्या (म्हणजेच माझ्या मुलाच्या) शाळेच्या रस्त्यावर दोन गणपतीची छोटीशी मंदिरं आहेत. मंदिरं म्हणजे त्या त्या अपार्टमेंट च्या गेटवर केलेले एक छोटेखानी आटोपशीर मंदिरं.. रोज एक पुजारी येऊन दोन्ही गणपतीची पूजा करून जातो.. त्याला जाळीचे दार असल्याने रस्त्यावरून जाणारे येणारे थांबुन पाया पडतात..

अथर्व शाळेत जाताना आमच्या अपार्टमेंट मधील पारिजातकाची ६ फुले घेतो..२  फुले दोन गणपतीला वाहतो.. बाकीचे ४ त्याच्या Teachers ला देतो..

 

 

 

 

 

 

मागच्या महिन्यात चांगलीच थंडी पडली होती..असेच एकदा नेहमीप्रमाणे अथर्वने ६  फुले घेतली पहिल्या गणपतीला वाहिले.. दुसऱ्या गणपतीला फुल वाहताना त्याच्या लक्षात आले गणपतीच्या अंगावर उपरणेच नाहीये..आणि त्याला तो शब्द माहिती पण नव्हता..चेहऱ्या वरचे भाव बदलत ..

 

 

 

 

अथर्व:- आई, जेजीबाप्पाने ड्रेसच घातला नाही आणि स्वेटर पण नाही घातला (त्याच्या अंगातल्या स्वेटरला पाहून) “आई, आपण गोपालन मॉल मधून जेजीबाप्पाला स्वेटर घेऊ” हां.. अथर्व

 

 

 

 

मी:- त्याचे बोलणे ऐकून (मनात त्यानेच तर तीन ऋतूं बनवले.. आहेत त्याला कशी थंडी वाजणार) असे पुटपुटत.. “हो नक्की घेऊयात” बाळा

 

 

अथर्व:- (खुश होत) रंगाची नाव सांगत होता जेजीबाप्पाच्या स्वेटरसाठी😍

 

त्यावेळी बालमनाची निरागसता कशी असते याचा भाव मनाला स्पर्श करून गेला

 

सौ. मुक्ता जोशी-कुलकर्णी
बंगळुरू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *