लगीन सराई आणि गाठभेठ (भाग २)

जनाची भेट…

काळ बदलत गेला काळमानानं साधनं सुद्धा बदलत गेले मानवी जीवनात नवीन नवीन साधनांननी आपली जागा शोधली त्यापैकी एक म्हणजे टीव्ही. त्यावेळेस टीव्हीचा आकर्षण जबरदस्त होतं आम्ही अगदी बालवयात होतो टीव्हीवरील विविध कार्यक्रम आम्ही बघायचो पण फार कमी कार्यक्रमाला आमची पसंती होती त्या बाल वयात क्रिकेट खेळण्याचा नाद आणि मग दूरदर्शनवर दिसणारे ते थेट प्रक्षेपण क्रिकेट सामन्यांचं त्या बाल मनाला वेड लावणार होत.

तो काळ ९२ ,९३ चा असेल ते ऑस्ट्रेलियात झालेले वर्ल्ड कप असेल किंवा मग भारतात साउथ आफ्रिकेचा दौरा . वर्णभेदाविरुद्ध साउथ आफ्रिकेत एक फार मोठा लढा संपला होता आणि त्या साऊथ आफ्रिकेने या महात्मा गांधीच्या देशात आपला पहिला क्रिकेट दौरा करण्याचे निश्चित केलं होतं .

त्याचा आकर्षण त्या काळात फार मोठे होतं. आम्ही त्यावेळेस नववीत होतो आणि टीव्हीवर एकच चॅनल दूरदर्शन. त्यावर थेट प्रक्षेपण क्रिकेट सामन्यांचे आम्ही बघण्यात गुंग होतो.

 

 

 

 

 

 

 

सगळ्याच्याच घरी मुलांनी अभ्यास करावा म्हणून आई-वडिलांची इच्छा असते आणि त्यासाठी ते थोडेफार रागावतात पण तसेच काहीतरी माझ्या एका मित्राच्या घरी घडत होतं त्याचे वडील त्याला शिव्या देत होते पण ते व्हिडिओ बालमन त्याला समजू शकलो नाही रागाच्या भरात घर सोडून निघून जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

 


त्या मित्राची अधून मधून कधी कधी भेट व्हायची थोडं खुशाली कळत. म्हणावा तसा वेळ कधी एकमेकाला आम्ही देऊ शकलो नाही. मी लेख मालिका लिहायला घेतली मी एक आनंद यात्री, राजू पाटील लच्छनकर तोही या लेख मालिकेचा एक वाचक नवे प्रशंसक आहे .

 

 

 

 

 

 

 

 

तेलंगाना मध्ये एका लग्न समारंभात आला होता आणि त्याला सहज माहिती कळली की लच्छन इथून फार जवळ आहे. सहज उत्सुकता आणि मित्र प्रेमापोटी त्यांनी मला फोन लावला मी या लगीन घाईत होतो पण मलाही आनंद झाला आणि मी त्याला सांगितलं की मी गावातच आहे तू ये. त्याला मार्ग सांगितला आणि तो माझ्या गावी लच्छनला आला.

 

 

 

 

 

 

 

मुळ शेतकरी कुटुंबाचा असल्यामुळे तो माझ्या शेतशिवारात रमला ,गाय वासरात आणि माझ्या माणसात रममान झाला. रात्रीच्या वेळी जेवण झाल्यानंतर रोहिणी नक्षत्राची चुनुक जाणवू लागली आणि माझ्या ठिकाणावर हळुवार वाऱ्याची झुळूक व्हावु लागली. त्या थंड हवेचा आनंद घेत आम्ही दोघं आणि माझी माणसं त्याच्या मागील जीवनाच्या काही आठवणी त्याच्याकडून ऐकू लागलो.

 

 

 

 

सहज उत्सुकता म्हणून विचारलं घरातून निघून दे गेल्यानंतर तू काय केलं. त्यांना सांगितलं नीट मुंबई गाठली जो सामना टीव्हीवर माझे वडील बघू देत नव्हते तो टेस्ट सामना मी वानखेडे स्टेडियम मुंबई मध्ये जाऊन बघितला. पुढे काय करायचं काही माहीत नव्हतं सामना संपला आणि मग मी मुंब ईत काही दिवस आणि काही रात्र अशाच घालवले नंतर मुंबईत काही वेळ वेटर म्हणून काम केलं.

 

 

 

 

 

 

 

मुंबईत काही मन लागलं नाही म्हणून मग मी माझा मोर्चा पुण्याकडे वळवला पुण्यामध्ये हळूहळू रमू लागलो कधीही डॉक्टरांच्या मेस मध्ये तर कधी एमआयडीसीमध्ये एक लेबर म्हणून मी काम करू लागलो .

 

 

 

 

 

घर सोडल्यानंतर आयुष्यात काहीतरी आपण बनवून घरी जायचं सूट बूट आणि गाडीत आई-वडिलांना एक आश्चर्याचा धक्का द्यायचा आहे हे स्वप्न उरी बाळगून मी ते कठीण जीवन जगत होतो.

 

 

 

 

 

पण हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागलं की आता ते शक्य नाही. मनातल्या भावना मनातल्या वेदना घराची ओढ मला अस्वस्थ करू लागल्या. आणि अशाच एका पावसात मी भिजत होतो .त्या धारा मला ओल्या चिंब करू लागल्या मनामध्ये विचारांचा काहूर माजलं होतं. त्या ओल्या चिंब धारा मध्ये सुद्धा माझं शरीर गरम होत होतं .आता बोला घरी यायची ओढ ,आई-वडिलांचे प्रेम जाणू लागलं होतं .माझी अधीरता, माझ्या भावना, माझं मन ,माझ्या शरीराला माझ्या आई वडिलांच्या गावी ओढू लागल होतं.

 

 

 

 

 

 

 

सात वर्षानंतर तो दिवस आला त्या दिवशी मी माझ्या वडिलांच्या गावी आलो. वडील एसटी महामंडळात कर्मचारी असल्यामुळे एसटी बस डेपोच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी जाऊन बसलो वडीलाचे मित्र ये जा करत होते ते मला ओळखत नव्हते पण मी त्यांना ओळखत होते. बराच वेळ गेल्यानंतर मी त्यांना माझी ओळख सांगितली त्यांनाही आनंद झाला आणि त्यांनी मला माझ्या घरी घेऊन गेले.

 

 

 

 

 

 

घरी गेल्यानंतर माझ्या वेडेपणाची हद्द झाली मी माझ्या आईची परीक्षा बघण्याचा प्रयत्न केला .एकदा जन्म दिलेली आई कधीच आपल्या बाळाला विसरू शकत नाही तीने मला अक्षरशः आपल्या प्रेमाच्या कुशीत ओढून घेतलं आणि तो आस्वाचा महापूर वाहू लागला आणि त्या महापुरात माझा गर्व, अहंकार ,राग ,द्वेष, केलेल्या चुका विषयी पश्चाताप या सारा गोष्टी वाहून गेल्या.

मन निर्मळ झालं होतं वडिलांच्या चरणी आता मी नतमस्तक झालो होतो. किती केला तरी बाप,मला आता काय करावे याविषयी त्याच्या मनात अनेक विचार येऊ लागले. त्यांनी मला सांगितलं की आता शिक्षणाला सुरुवात कर.

 

 

 

 

 

उराशी आता एक नवीन स्वप्न होतं माझ्यापेक्षा सात ते आठ वर्षांनी लहान असलेल्या मुलांन सोबत मी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली पुढील शिक्षण मी नांदेड शासकीय तंत्रनिकेतन येथे पूर्ण केलं आणि मग हातामध्ये काहीतरी शिक्षणाची कागद घेऊन पुन्हा एकदा जीवन संघर्षासाठी पुणे गाठलं माझ्यासोबत ची मित्र बरेच पुढे गेली होती. त्याची मला जाणीव होती मी मात्र मुकाट्याने आता माझी खडतर वाटचाल सुरू केली.

 

 

 

 

 

 

माझी माणसं आणि मी स्तब्ध होऊन त्याची कहाणी ऐकत होतो वाऱ्याची झुळूक आता बंद झाली होती झाडाची पाने सुद्धा आपली हालचाल बंद केली होती जणू काही जनार्धन नागमपल्लेचा संघर्ष ऐकून स्तब्ध झाली होती.

 

 

 

 

 

 

खरंच जीवनाच्या या अनेक छटा जीवनाच्या अनेक संघर्ष कथा मी अनुभवत होतो आणि अशा या माझ्या संघर्षशील मित्रांच्या यशाचा आनंद घेत होतो.

 

 

 

 

त्याचे ते शेवटचे बोल माझ्या अश्रूचे बांध तोडत होते आज मी जरी फोर्स मोटरमध्ये उच्चपदस्थ अधिकारी म्हणून काम करत असलो तरी यश पाहण्यासाठी माझी आई नाही याची मला वेदनादायी दुःखद जाणीव आहे.

 

 

 

 

‌‌ वडील ही आता विविध व्याधीने ग्रस्त आहेत आई तर आता या जगात नाही पण एवढं मात्र निश्चित हेच सुखकर जीवन जगावं अशीच त्यांची इच्छा नक्कीच मी पूर्ण केली असे मला वाटते .
या सर्व जडणघडणीत माझ्या पत्नीचा मोलाचा सहभाग आणि साथ मला भेटली त्याचप्रमाणे पुढील आशा म्हणून माझ्या दोन्ही मुलांकडे मी पाहतो.

 

 

 

 

त्याचं बोलणं आता थांबल होतं .रात्रबरीच झाली होती. रात्रीचं चांदणं मी आणि माझ्या माणसाच्या डोळ्यातील अश्रू चमकवत होतं. मनात अनेक भावनांचे वादळ घेऊन पायाकडे पडलेली घोंगडी डोक्यापर्यंत ओढली आणि गतकाळ विसरून भविष्याच्या विचाराने
निद्रेच्या अधीन मी गेलो.

 

 

*@ मी एक आनंदयात्री*
*राजू पाटील लच्छनकर*
6304873724

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *