हैदराबाद काचीगुडा प्रतिनिधी दि.२५ :- स्थानिक महाविद्यालयात आयोजित मार्गदर्शन सत्रात सर लक्ष्मण यांनी विद्यार्थ्यांना EAMCET आणि JEE Mains या स्पर्धा परीक्षांचे शैक्षणिक आणि व्यावसायिक आयुष्यातील महत्त्व समजावून सांगितले.
सरांनी स्पष्ट केले की EAMCET (इंजिनिअरिंग, ऍग्रिकल्चर आणि मेडिकल कॉमन एन्ट्रन्स टेस्ट) ही परीक्षा राज्यातील नामांकित अभियांत्रिकी, कृषी आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तर JEE Mains द्वारे विद्यार्थ्यांना देशातील नामांकित NITs, IIITs आणि IITs सारख्या संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होते.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना लवकर तयारी सुरू करून संकल्पनांवर मजबूत पकड ठेवण्याचे, सातत्याने सराव करण्याचे आणि वेळेचे नियोजन पाळण्याचे मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की “कष्ट, नियोजन आणि नियमित सराव हेच यशाचे सूत्र आहे.”
सत्राच्या शेवटी सरांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देत म्हटले, “शिस्त, निष्ठा आणि दृढनिश्चय या तीन गोष्टी यशाचे खरे आधारस्तंभ आहेत.”
