अमरावती प्रतिनिधी,दि.०७ :- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे महोदयांच्या निर्देशानुसार नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आणि ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ प्रभावीपणे राबवण्यासाठी येत्या बुधवार, 18 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये ‘तालुकास्तरीय जनसंवाद व तक्रार निवारण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी या संदर्भात आदेश निर्गमित केले असून, प्रत्येक तालुक्यासाठी वरिष्ठ समन्वयक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
या कार्यक्रमात नागरिकांच्या वैयक्तिक व सार्वजनिक तक्रारी, विविध विकासकामांची सद्यस्थिती, प्रलंबित प्रस्ताव आणि स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या प्रश्नांचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. या दिवशी तहसील स्तरावर जिल्हा परिषद तसेच संबंधित तालुक्यातील सर्व विभागांचे अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसचिव आणि कृषी सहाय्यक यांची उपस्थिती राहणार आहे.
तालुकास्तरीय जनसंवाद व तक्रार निवारण कार्यक्रमासाठी समन्वयक अधिकारी.
प्रशासनाने तालुकानिहाय जबाबदारी सोपवली असून उपस्थितीत तालुकास्तरीय जनसंवाद व तक्रार निवारण कार्यक्रम घेण्यासाठी खालीलप्रमाणे समन्वयक अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येत आहे. अचलपूर तालूक्यातील उपजिल्हाधिकारी महसूल विवेक जाधव, प्रकल्प संचालक प्रिती देशमुख, तहसिलदार सुदर्शन सहारे, दर्यापूर तालुक्यातील उपजिल्हाधिकारी निवडणूक शिवाजी शिंदे, उपमुकाअ बाळासाहेब रायबोले, तहसिलदार रविंद्र कानडजे, अमरावती जिल्ह्यातील जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे,
उपमुकाअ श्रीराम कुळकर्णी, तहसिलदार विजय लोखंडे, धारणी तालुक्यातील उपजिल्हाधिकारी रोहयो ज्ञानेश्वर घ्यार, कार्यकारी अधिकारी सुनिल जाधव, तहसिलदार प्रदिप शेवाळे, भातकुली तालुक्यातील उपजिल्हाधिकारी पुनर्वसन श्रध्दा उदावंत, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी शिल्पा पवार, तहसिलदार अक्षय मंडवे, चांदुर रेल्वे तालुक्यातील उपजिल्हाधिकारी प्रसन्नजीत चव्हाण, कृषी विकास अधिकारी मल्ला तोडकर, तहसिलदार पुजा माटोडे, मोर्शी तालुक्यातील उपजिल्हाधिकारी भूसंपादन सुषमा चौधरी,
शिक्षणाधिकारी माध्यमिक प्रिया देशमुख, तहसिलदार सागर ढवळे, वरूड तालुक्यातील उपविभागाय अधिकारी प्रदीप पवार, शिक्षणाधिकारी प्राथमिक सतीश मुगल, तहसिलदार रामदास शेळके, चांदुर बाजार तालुक्यातील उपविभागीय अधिकारी बळवंत अरखराव, जिल्हा आरोग्य अधिकारी प्रविण पारिसे, तहसिलदार मनोज सोनारकर, तिवसा तालुक्यातील उपविभागीय अधिकारी दादाराव दराडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, तहसिलदार मयुर कळसे, धामणगाव रेल्वे तालुक्यातील उपजिल्हाधिकारी दुर्गा देवरे, उपमुकाअ पंचायत बाळासाहेब बायस, तहसिलदार अभय घोरपडे, चिखलदरा तालुक्यातील सहा.
जिल्हाधिकारी सिध्दार्थ शुक्ला, कार्यकारी अधिकारी बांधकाम दिनेश गायकवाड, तहसिलदार जीवन मोराणकर, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, उपमुकाअ मबाक विलास मरसाळे, तहसिलदार अश्विनी जाधव, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे, सहा. गविअ, पंचायत विभाग सुनिल गवई, तहसिलदार पुष्पा सोळंके हे समन्वयक म्हणून कामकाज पाहणार आहेत.
वरील प्रमाणे जिल्हा परिषद तसेच संबंधित तालुक्यातील इतर सर्व विभागाचे अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसचिव, कृषी सहायक यांचे उपस्थितीत तालुक्यातील जनसंवाद व तक्रार निवारण कार्यक्रम आयोजित करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.
