विश्व परिवाराद्वारे व्यसन मुक्तीतुन आनंदी जीवनाकडे वाटचाल कार्यक्रम संपन्न.

देगलूर प्रतिनिधी, दि.०४ :- विश्व परिवाराद्वारे व्यसन मुक्तीतुन आनंदी जीवनाकडे वाटचाल हा कार्यक्रम २ ऑक्टोबर रोजी पार पडला या व्याख्यानमालेचे उदघाटन माननीय आमदार जितेशजी अंतापूरकर व माजी खासदार व्यंकटेशजी काब्दे यांच्या हस्ते झाले.

डाँ.सुनिल जाधव यांच्या सुमधूर भावगीत व देशभक्तीपर गीत जैसा सोचोगे तुम वैसा बन जाओगे , इन्साफ की डगर पे बचो दिखाओ चल्के ये देश है तुम्हारा नेता तुम्हीं हो कल के आदी गीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली.

यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी सौम्याजी शर्मा, ब्रह्माकुमारी देगलुर सेवा केंद्र संचालिका लक्ष्मी बहेनजी, तहसिलदार मा. राजाभाऊ कदम,पी. आय. सोहन जी माछरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 

या कार्यक्रमाचे सूत्र संचालन कैलासभाऊ येसगे कावळगावकर यांनी केले त्यात ते म्हणाले की बी. के. लक्ष्मी बहेनजी , विद्या बहेनजी , डॉ . सुनील जाधव , नाना मोरे सह व्यसन मुक्ती टिम द्वारे देगलुर, बिलोली , मुखेड तालुक्यात शाळा , विद्यालयात व्यसन मुक्ती अभियान राबवले त्यामुळे महात्मा गांधी व्यसन मुक्ती सेवा राज्य स्तरीय पुरस्कार महाराष्ट्र शासनाने दिला हॆ गौरवशाली कार्य आहे म्हणुन लक्ष्मी बहेनजी यांचा सन्मान केला व टिम चे अभिनंदन केले .

 

 

प्रास्ताविक आम्रपाली येसगे यांनी केले तर आभार निखील जाधव यांनी व्यक्त केले याप्रसंगी माजी शिक्षण सभापती मिसाळे गुरूजी, माजी नगराध्यक्ष मोगलाजीआण्णा शिरशेटवार, मा.जि.प. सदस्य अनिल पाटील खानापूरकर, निवृत पोलिस उपअधिक्षक रमेशजी कंतेवार, शिवसेना तालुकाप्रमुख महेश पाटील, उपनगराध्यक्ष अविनाश निलमवार,संभाजी ब्रिगेड शहर उपाध्यक्ष डॉ.सुनील जाधव , राष्ट्रवादी कॉंग्रेस चे नाना मोरे , माजी शिक्षण व क्रिडा समिती सदस्य बस्वराज पाटील वन्नाळीकर, काँग्रेसचे घोंगडे मँडम,वैशाली सागावे , प्रा. गंगाधर हिंगोले, ज्येष्ठ पत्रकार अविनाश देशपांडे हसनाळकर, मराठा महासंघाचे जयदीप वरखिंडे, विठ्ठलराव चुकाबुटले, प्रशांत पाटील आचेगावकर, राष्ट्रवादीचे ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष माधवराव फुलारी, शिवा संघटनेचे तालुका अध्यक्ष अशोकराव मजगे, वंचितचे तालुका अध्यक्ष संजयभाऊ कांबळे, भाजपाचे अशोकआण्णा साखरे, डाँ. धमनसुरे, जेष्ठ नागरिक संघाचे भाऊसाहेब मोरे, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष सुरेश चप्पलवार, शिक्षक संघटनेचे विश्वनाथ पाटील केदारकुठेकर, शिक्षक सेनेचे गोविंद सुवर्णकार, जुनी पेन्शन शिक्षक संघटनेचे संतोष शिंदे, उत्तमराव वाडीकर, एकनाथ टेकाळे, विस्तार अधिकारी कानडे साहेब, व अनेक शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर, सरपंच मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. पुणे येथील समाज माध्यम तज्ञ मा. मुक्ता चैतन्य व शिक्षणतज्ञ शंतनू कैलासे यांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन यावेळी लाभले.

 

या वेळी शंतनु कैलासे यांनी मोबाइल रूपी बॉम्ब आपण खिशात घेऊन फिरत आहोत , कोरोना काळात मोबाईल वापरावा लागला पण त्या मुळे विद्यार्थ्यास त्याची सवय झाली व ती आता त्यांना आनंदी जीवना कडुन एकलकोण्डेपना , चिड्चिडेपणा , शारिरिक , भावनिक समस्याना सामोरे जावे लागत आहे. या वर आताच आवर घालणे गरजेच आहे असे प्रतिपादन केले . यानंतर मुक्ता चैतन्य यांनी समाज माध्यमाचा वापर हा अति काळजीने करावा यातून गुन्हा घडणार नाही याची दक्षता घ्यावी व भविष्य सुरक्षित करावे . विद्यार्थ्यास मोबाईल हा अभ्यासासाठी वापरावा लागला पण तो त्यांचे जीवन बरबाद होईल अशी सवय त्यांना लागु नये या साठी दक्ष राहणे गरजेचे आहे असे युवा विद्यार्थ्याना संबोधित केले.

विश्व परिवार आयोजित व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी एच.एस. खंडागळे, कैलास येसगे, डॉ. सुनील जाधव , गंगाधर आऊलवार , निखील जाधव,जावेद अहमद, प्रा. शिवकुमार जाधव, शिवाजी मैलापूरे, विश्वनाथ येसगे, मनधरणे संतोष, शिवपुजे, बसवंत पटणे व विश्व पब्लिक स्कूलचे सर्व शिक्षिकांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *