कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा बंद करू नये देगलुर संभाजी ब्रिगेडची मागणी

 

देगलुर प्रतिनिधी, दि.१५ :-   विस पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा बंद करू नये या साठी देगलूर तालुका संभाजी ब्रिगेड यांच्यावतीने तहसीलदार राजाभाऊ कदम यांना एक निवेदन देण्यात आले .

शिक्षण हितार्थ देगलुर संभाजी ब्रिगेड चे राहुल पाटील थड्के , बालाजी पाटील जाधव , अँड. अंकुश राजे जाधव , डॉ. सुनील जाधव , आकाश वड्जे , जगदीश पाटील जाधव , संतोष चिद्रावार , ज्ञानेश्वर जाधव , अनिल पाटील , दत्तात्रय जाधव , माधव खुनेवाड, अमोल मेह्त्रे , बालाजी जबडे , तानाजी सकनुरे व तालुक्यातील ईतर पदाधिकारी यांनी वीस पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा बंद करायची कार्यवाही शासनाने करू नये.

 

 

कारन गोर गरीब , वाडी , तांडा , वस्ती , दुर्गम, आदिवासी भागात , दळण वळण सोपे नसलेल्या भागातील विद्यार्थ्यास या शाळा बंद केल्याने विशेषतः जिथे नाले , नद्या आहेत , पुल नाहीत , जंगल भाग , डोंगराळ भागात मुलीना दुसरी कडे जाऊन शिक्षण घेणे शक्य होणार नाही , म्हणुन शेतकरी , कष्टकरी , गरीब ,आर्थिकदृष्ट्या दुर्बल पालकांना त्यांच्या मुला मुलीना शिक्षण देणे अशक्य होईल म्हणुन या शाळा बंद करू नये .गुणवत्ता , विकासा साठी शिक्षक भरती करून रिक्त पदे भरा , शिक्षकाची अशैक्षनीक विविध कामे काढुन घ्या , पुरेशा भौतिक सुविधा द्या इत्यादी मागण्या ही यावेळी केल्या

 

. संबंध महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेड द्वारे विद्यार्थी संख्या कमी चे कारण लाऊन शाळा बंद करू नका असे निवेदन देऊन शाळा बंद चा निर्णय रद्द करावा नाही तर आंदोलन करण्यात येईल अशी भुमिका संभाजी ब्रिगेड ची आहे .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *