लगीनसराई आणि गाठ भेट

 

 

वैशाखत ऊन तापू लागलं की मग शेत शिवाराची कामे जरा थंडच होतात. जनावरांची चारापाण्याची सोय करणे हे एकच मुख्य काम असतं. शेतशिवारतील रानही मोकळी असतात अन् नद्या कोरड्या म्हणूनच की काय पूर्वीपासून या महिन्यात लग्न मुहूर्त असतात गावाकडील संपर्क मित्रपरिवार नातेवाईक मंडळी यामुळे बऱ्याच लग्न समारंभात हजर राहावे लागते एकाच दिवशी चार-पाच

लग्नाचे आमंत्रण असले की मग एखाद्या लग्नाची लग्नात उपस्थित राहण्याची जबाबदारी पत्नीलाही घ्यावी लागते आणि मग तीन-चार लग्नाला मी उपस्थित राहतो नुसती धावपळ करत लग्नाला उपस्थित राहावे लागते.

 

 

 

याच काळात बऱ्याच लोकांचा संपर्क होतो गाठभेट होते जुन्या आठवणींना उजाळा मिळतो बऱ्याचदा नवीन ओळखी पण होतात माणसांची आवड असणाऱ्यांना हा काळ आनंदाचा असतो अशा लगीन घाईत याही वैशाखात मी होतो.

 

 

 

 

सासरवाडीत लग्न ,आजोळी मामाच्या मुलाचं लग्न, गावाकडील तीन चार लग्न, मित्रपरिवारातील चार लग्न अशा धावपळीत मी होतो. आपल्याला कोणी आठवणीने आमंत्रण दिलं तर त्याचा मान राखण्याचा मी प्रयत्न करतो. नात्यातील जुन्या मर्मबंधांना फुंकर घालण्याचा प्रयत्न म्हणून, तर कधी मैत्री जपण्यासाठी, तर कधी एखाद्या गरीबा घरी जाऊन त्याच्या आनंदात सहभागी होण्याचा प्रयत्न या लग्नसमारंभाच्या निमित्ताने मी करत होतो.

 

 

 

याच काळात एका चा फोन आला नंबर नवीनच होता. मी तो उचलला. तिकडून आवाज आला मी रामदिनवार बोलतो. ओळखलं का. त्याला नाराज करू नये म्हणून मी म्हणालो ओळखलं बोला .काही नाही मी गावाकडे आलो .तुला भेटावं म्हणतो. मी म्हणालो काही हरकत नाही ये ना मी उद्या रिकामाच आहे ये घरी. त्याच्या बोलण्यातला आपलेपणा प्रेम आणि या वयात अरे तुरे न बोलणं

 

 

 

 

मला बालवयातील मित्रामध्ये घेऊन जात होतं . अन मग तिथे मला बालाजी रामदीनवार भेटला. खात्री करून घ्यावी म्हणून आमच्या दहावीपर्यंतच्या मित्रांचा एक व्हाट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुपच्या ग्रुप ॲडमिन राजेश काप्रतवार याला फोन केला आणि माझी खात्री झाली तो माझा बालमित्र रामदिनवार च होता. मुंबईत जीएसटी ऑफिसर म्हणून कार्यरत आहे.

 

 

 

दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे तो माझ्या घरी आला घरी कोणीच नव्हतं घरची मंडळी लग्न समारंभात उपस्थित राहण्यासाठी पाहुण्याकडे गेले होते. माझ्याविषयी त्याला बरीच माहिती होती पण मला त्याच्याविषयी फारच कमी माहिती होती आणि त्यात त्यांन केलेल्या त्या जीव घेण्या संघर्षा विषयी तर साधी भनक पण मला नव्हती फक्त बऱ्याच वर्षांनी मित्र भेटल्याचा आनंद मला होता. सहज उत्सुकता म्हणून मी त्याला त्याची माहिती विचारली अन तो सांगू लागला‌.

 

 

 

 

सर्वांसारखं मी ही दहावी बारावी केलं आणि इंजिनिअरिंगला प्रवेश मिळविला पण पदरी अपयश आलं प्रथम वर्षात नापास झालो माझं मन काही तिथे रमत नव्हतं परत देगलूरला आलो बीए केलं आणि अर्थशास्त्रात नांदेडला एम ए केलं. घरची परिस्थिती बेताची फार काही सधनता नव्हती आणि काहीतरी नोकरी काम धंदा मला

 

 

 

 

करावा लागणार होतं .बहिणीचे लग्न ,घरसंसार त्याचा ताण माझी आई घ्यायची मग मुला मुलींचं जीवन चांगलं व्हावं ही आई-वडिलांची इच्छा नुसती इच्छा होती पण जीवन घडविण्याचे सामर्थ्य त्यांच्या नव्हतं ते फक्त आशीर्वाद देऊ शकत होते पण प्रत्यक्ष काही मदत करू शकत नव्हते.

त्या कटू आठवणींना उजाळा देताना त्याच्या मनाला वेदना होत होत्या पण त्याला मन मोकळ करायचं होतं आणि त्यांन मला निवडलं होतं तो पुढे सांगू लागला सुरुवातीला संतोष धर्माजी या मित्राच्या साह्याने एसटी महामंडळाचा वाहक म्हणून लायसन्स काढलं बॅच नंबर मिळाला होता पण बिल्ला मिळाला नव्हता.

 

 

 

 

याच काळात नोकरीच्या शोधात मुंबईला गेलो मामाच्या मदतीमुळे मुंबईत राहण्याची सोय झाली आणि मुंबई विभागात बस वाहक या पदासाठी माझी निवड झाली. मी आनंदात होतो मी जेव्हा कामावर रुजू होण्यासाठी गेलो तेव्हा त्या अधिकाऱ्यांनी मला बॅच नंबर आणि बिल्ला ज्यावर नाव बॅच नंबर लिहिलेला असतो ते मागितलं या साऱ्या गडबडीत बिल्ला मिळवायचा राहून गेल होतं.

 

 

 

 

तेव्हा अधिकाऱ्यांनी मला कामावर रुजू करून घेण्यास नकार दिला. हाता तोंडाशी आलेला घास कोणीतरी हिसकावून घेतल्याची जाणीव मला अनंत काळाच्या वेदना देत होती. त्या वेदनेचा प्रहार इतका प्रचंड होता की मी सहन करू शकलो नाही जागेवर बेशुद्ध पडलो ती माझी अवस्था त्या अधिकाऱ्याच्या मनात प्रेम आपुलकी तसेच दया उत्पन्न करत होती त्यांनी मला भानावर आणलं.

 

 

 

 

पाणी प्यायला दिलं आणि धीर देत म्हणाला तुझ्याकडे लायसन्स तर आहेच की करून घेऊ बिल्ला, तुम्ही कामावरून रुजू व्हा.
मी पनवेल आगारात वाहक म्हणून रुजू झालो नवीन असल्यामुळे मला त्रास होऊ लागला कारण एका तालुक्याच्या गावी माझं जीवन गेल होतं आणि ती मुंबईची गर्दी त्या गर्दीत जीव गुदमरू लागला.

 

 

 

 

 

प्रचंड लोकांची गर्दी बस मध्ये असायची तिकीट काढेपर्यंत काही भामटे चकमा देऊन गाडीतून उतरून जायचे त्याचाही फटका मला बसला. अनेकदा मला फाईन भरावा लागलं कष्टाने कमवलेला पैसा फाईन मध्ये भरावा लागत होतं आणि कधी कधी पनवेलच्या अवतीभवती असलेल्या वस्त्यांमध्ये रात्रीच्या मुक्कामाची ड्युटी

 

 

 

 

लागायची तिथे कुठे असते वाहक चालक यांना आंघोळीची किंवा झोपायची व्यवस्था या सर्वांची त्रास होतो हे सर्व सोडून जावं वाटायचं पण परिस्थिती माझ्या अनुकूल नव्हती आणि त्यातच माझं लग्न झालं आणि एक जबाबदारी वाढली.

 

 

 

पण माझा संयम संपला जेव्हा माझ्या आईच्या निधनाची बातमी मला कळाली तिला ब्रेन ट्यूमर झाला होता आणि त्यातच तिचा अंत माझ्या संयमाचा अंत करणारा ठरला माझ्या भावना मला अस्थिर करत होत्या मी वेडा पिसा झालो होतो. आईच्या दुःखद निधनामुळे अन् या मरणप्राय यातना सोसण्यात मी असमर्थ ठरलो. सर्व काही सोडून घरी जाऊन बसलो.

 

 

 

पण जीवन अश्या भावनावर थोडं जगता येतं .बहिणींचा आग्रह, वडिलांचे दुःख ,पत्नीची जिम्मेदारी आणि माझ्या सासऱ्याचे धीराचे बोल मला नवीन काही करण्यासाठी प्रेरित करत होते आणि त्या नेमक्या क्षणी मी निर्णय घेतला जीवनात काहीतरी करायचं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षेची मी तयारी केली आणि त्यात उत्तीर्णही झालो आणि मग सेल टॅक्स आत्ताचे जीएसटी विभागात रुजू झालो.

 

 

 

 

सर्व सांगताना तो जितका भावविवश होता तितकाच मी अश्रुनी घेरला गेलो होतो. मग काय ठरवलं आणि आज यश मिळवलं त्याचे शेवटचे बोल मी ओळखले तो काहीच बोलला नाही. फक्त त्याचे अश्रू सांगत होते त्याच ऐश्वर्य आणि यश अश्रू पुढे फिके पडत होत.

 

 

 

बराच वेळ झाला होता. तो माझा निरोप घेत होता मी सहज विचारलं गाडी आणली नाही तर मी माझ्या मोटरसायकलवर तुला सोडतो त्याचे उत्तर होतं आपल्या माणसांना काय आपलं मोठं पन दाखवायचं .तू मला तोच राजा आहेस आणि मी तुला तोच रामदीनवार. अरे अशा जागा तरी कुठे आहेत जिथे या फक्त बालाजी रामदीनवारला एक मोकळे पणाने कोणीतरी समजून घेईल.

 

 

 

त्याच ते सहज वागणं. संपत्ती असूनही साधेपणाने राहण. जाता जाता मला सांग न ,मी तुझी लेखमालिका मी एक आनंद यात्रीचा वाचक आहे, हे मनाला स्पर्श करून गेलं. अरे वेड्या तुला काय माहित तुझ्यासारखी माणसं तर माझ्या लेखणीला प्रेरणा देत असतात आणि तूच तर माझ्या नवीन लेखाचा सूत्रधार आहेस.

 

 

 

 

अनेक सुखदुःखांच्या जीवनातल्या चढउतारांचा स्पर्श माझ्या मनाला होत राहतो तुझ्यासारखे मित्र जेव्हा भेटतात, तुझ्यासारखी माणसेच माझ्या लेखणीची खरी ताकद आहेत. तुमच्या आनंदात मी माझा आनंद शोधतो उगाच नाही मी एक आनंद यात्री.

@मी एक आनंद यात्री

राजू पाटील लच्छनकर

मो.6304873724

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *