मुखेड प्रतिनिधी दि.३१ :- काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या बहुचर्चित भारत जोडो यात्रा मध्ये कन्याकुमारी ते काश्मीर चालणाऱ्या सर्व पदयात्री भारतयात्रींना युवक काँग्रेस कडून “बेहतर भारत की बुनियाद” म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.
यात मराठवाड्यातील एकमेव भारतयात्री डॉ श्रावण रॅपनवाड यांचा बेंगळुरूत गुरुवारी (दि.२७) मोठा सन्मान करण्यात आला.
कर्नाटकची राजधानी बेंगळुरू शहरातील पॅलेस ग्राउंड येथील गायत्री विहार या

विशाल मैदानात अखिल भारतीय युवक काँग्रेस कडून एक देशव्यापी युवा परिसंवाद व सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याचे उद्घाटक मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार तर मध्य
प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.वी.श्रीनिवास, युवानेता कन्हैय्याकुमार,पवन खेरा आदींसह देशातील अनेक काँग्रेस नेते उपस्थित होते. देशभरातून आलेल्या हजारो युवक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कन्याकुमारी ते काश्मीर असे निघालेल्या भारत जोडो यात्रेत पूर्ण
चाललेल्या भारत यात्री चा सन्मान “बेहतर भारत की बुनियाद” ( Foundation of Better India) हा सन्मान देऊन सत्कार करण्यात आला. राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत कन्याकुमारी ते काश्मीर 4080 किलोमीटर चाललेले प्रारंभी
पासून मराठवाड्यातील एकमेव भारत यात्री डॉ.श्रावण रॅपणवाड यांचा सन्मान मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री राजासाब खा. दिग्विजय सिंह आणि अखिल भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.वी.श्रीनिवास यांच्या हस्ते काँग्रेसचे वस्त्र हार, सन्मान
वस्त्र सन्मान फेटा व सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला. देशाच्या सद्यस्थितीतील कठीण काळातून बाहेर काढून संविधानाला अभिप्रेत भारत बनविणारे पायाभूत व्यक्ती म्हणून हा सन्मान देण्यात आला.तीन दिवस चाललेल्या या परिसंवादात
देशातील सद्यस्थितीसह अनेक विषयावर अनेक विचारवंतांची मते मांडण्यात आली.
काँग्रेस प्रदेश सचिव तथा हिंगोली चे सहप्रभारी भारतयात्री डॉ.श्रावण रॅपनवाड हे ‘बेहतर भारत की बुनियाद’ ने सन्मानित झाल्याबद्दल माजी मुख्यमंत्री अशोकराव
चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर,माजी मंत्री डीपी सावंत, माजी आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष अमरभाऊ राजूरकर,माजी आ. हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी
आ.अविनाशराव घाटे, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष वसंतराव पाटील चव्हाण, आ. माधवराव पाटील जवळगावकर, आ. मोहन अण्णा हंबर्डे, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा,आ.जितेश अंतापुरकर, जि.प.माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर,
प्रदेश सचिव ऍड.सुरेंद्र घोडजकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, डॉ. मीनलताई खतगावकर,युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष संतोष बोनलेवाड, वरिष्ठ नेते शेषेराव चव्हाण,राजन देशपांडे, सुभाष पाटील दापकेकर,काँग्रेस तालुकाध्यक्ष
राजीव पाटील रावणगावकर, शहराध्यक्ष नंदकुमार मडगुलवार, दिलीप कोडगीरे, हणमंत नारनाळीकर, संजय वडजे आदींसह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

