गडचिरोली जिल्हा निर्मितीला उद्या२६ वर्ष पूर्ण गडचिरोली जिल्हा वर्धापनदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शुभेच्छा!

 

गडचिरोली जिल्हा निर्मितीला उद्या२६ वर्ष पूर्ण गडचिरोली जिल्हा वर्धापनदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शुभेच्छा!

 

गडचिरोली प्रतिनिधी, दि.२६:- गडचिरोली जिल्हा घोषित करून ऑगस्ट २६ रोजी ४३ वर्ष पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हावासियांना शुभेच्छा देताना गडचिरोली हा आमच्यासाठी राज्यातील शेवटचा नाही, तर पहिला जिल्हा

 

 

असल्याचे सांगितले. २०१४ पासून गडचिरोलीला विकासाच्या केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न झाला असून, माओवादमुक्त करणे, उद्योग, शिक्षण, रोजगार आणि पायाभूत सुविधा निर्माण करणे हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य

 

 

 

राहिले आहे. आज जिल्हा माओवादमुक्त होत असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या २०२६ पर्यंत देश माओवादमुक्त करण्याच्या निर्धाराकडे आम्ही वेगाने वाटचाल करतो आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

 

सी-६० जवान व पोलिसांनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख करून ‘दादालोरा खिडकी’सारख्या उपक्रमांनी पोलिस विकास प्रक्रियेतील खरे अग्रदूत ठरले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. गडचिरोलीला पोलाद सिटी बनविण्यासाठी १ लाख

 

 

कोटींची गुंतवणूक होत असून, या प्रक्रियेत जिल्ह्याचे जल, जमीन, जंगल आणि पर्यावरण यांचे संवर्धनही तेवढ्याच गांभीर्याने केले जात आहे. मेडिकल कॉलेज, विमानतळ, रेल्वेमार्ग, रस्त्यांची कामे व शिक्षणाच्या सुविधा या सर्व

 

 

क्षेत्रांत गडचिरोली वेगाने प्रगती करत आहे आणि यात नागरिकांची भक्कम साथ लाभत असल्याने विकास प्रक्रिया गतिमान झाल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले आहे.