शेतकऱ्यांना ८३०० रुपये ऐवजी हेक्टरी ५०,००० हजार रुपये आर्थिक मदत द्या-धनाजी जोशी.

देगलूर प्रतिनिधी दि.२७ :- नांदेड जिल्हात मागील काही दिवसांपासून सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून सरकारने जाहीर केलेली ८३०० रुपये हेक्टरी ही मदत अल्प असून हेक्टरी ५०,००० रुपये एवढी मदत द्यावी अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे देगलुरचे सामाजिक कार्यकर्ते धनाजी जोशी यांनी मेलद्वारे केली आहे.

 

 

या अतिवृष्टीमुळे कापूस,सोयाबीन,तूर,उडीद, मूग,केळी या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सर्व पिके वाहून गेली आहेत अनेक ठिकाणांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत अतिवृष्टीबाधीत व पूरपरिस्थितीत मुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना भरीव मदत शासनामार्फत व्हावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

 

विविध विकासकामांसाठी सरकार मोठया उद्योजकांकडून CSR फंड (निधी) उभा करतात असा CSR निधी शेतकऱ्यांसाठी उभा करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५०,००० हजार रुपये मदत तात्काळ देण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली.या मागणीचे निवेदन मेलद्वारे मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना देगलूरचे सामाजिक कार्यकर्ते धनाजी जोशी यांनी दिले.