“मायेची ऊब २०२६” आठव्या वर्षाच्या उपक्रमाचा उत्साहात शुभारंभ

 

 

नांदेड प्रतिनिधी दि.२८ :- रस्त्यावर कुडकुडत झोपणाऱ्या निराधारांना आधार देण्यासाठी धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या “मायेची ऊब” या २०२६ ब्लॅंकेट वाटप उपक्रमाचा शुभारंभ नांदेडभूषण संतबाबा बलविंदरसिंघजी, भाजपा महानगराध्यक्ष अमर राजूरकर, लायन्स उपप्रांतपाल राहुल औसेकर आणि योगेश जायस्वाल यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात झाला.

 

 

आगामी ४० दिवस दररोज मध्यरात्री नांदेड शहरातील विविध रस्त्यांवर फिरून निराधारांना ब्लॅंकेट वाटप केले जाणार आहे.

 

 

 

भाजपा महानगर नांदेड, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल, अमरनाथ यात्री संघ आणि सन्मित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नगीनाघाट येथे रथपूजन करून उपक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविकात संयोजक ॲड. दिलीप ठाकूर यांनी या उपक्रमामागील सामाजिक प्रेरणा स्पष्ट केली.

 

 

“दिलीप ठाकूर हे सातत्याने निरपेक्ष भावनेने वंचितांसाठी कार्य करतात,” असे कौतुक संतबाबा बलविंदरसिंघजी यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.

 

 

 

यावर्षीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आणखी 886 ब्लॅंकेटची आवश्यकता असल्याचे राजेशसिंह ठाकूर यांनी सांगितले व दानशूर नागरिकांनी मदतीचे आवाहन केले. पहिल्या दिवशी दोन सत्रात अडीचशे निराधारांना ब्लॅंकेटचे वितरण करण्यात आले.

 

 

 

या कार्यक्रमाला विजय येवनकर, किशोर यादव, साहेबराव गायकवाड, आशिष नेरलकर, लतादीदी जायस्वाल, डॉ. शितल भालके, शततारका पांढरे, महादेवी मठपती, ज्योती कल्याणकर, अर्पणा चितळे, मीना भोसले, लक्ष्मी वाघमारे, तौसिफ अहमद ,गौरव कोडगिरे, राज यादव, अशोक पडगीलवार, गोपाळ पवार, सविता जम्पलवाड, बालाजी मोरलवार, गोविंद कन्नडकर, विशाल भद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

 

मान्यवरांचे स्वागत सुरेश लोट, अरुण काबरा, सुरेश शर्मा, जयश्री ठाकूर, सविता काबरा यांनी मोत्याची माळ अर्पण करून केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवा लोट यांनी, तर आभार प्रदर्शन सुरेश निल्लावार यांनी केले.

 

 

दानशूरांची यादी
प्रमोद हिबारे, ॲड. दिलीप ठाकूर, रूपेश वट्टमवार, सीतारामजी जाजु, अशोक पडगीलवार, स्नेहलता जायस्वाल, अशोक गंजेवार, शशिकांत देशपांडे, अंकीता मुत्तेपवार, डॉ. राजेंद्र मुंदडा, मोहित व रेणुका सोनी, प्रा. प्रभाकर उदगीरे, सतीश सुगनचंदजी शर्मा, डी.एच. अग्रवाल, नारायण गायकवाड, अज्ञात दाता, अविनाश चिंतावार, अबिरा गौरी राहुल पवार, साईनाथ पदमवार, संजय खुपसे, कैलाश झंवर, सौ. गयाबाई कदम, सोनाली वारले,

 

 

 

शिवराज विंचूरकर, विश्वेश्वर नांदेडकर, तिरुपती कल्याण, सुधाकर जबडे, प्रा. एस.एस. झंपलवाड, हरिसिंह चव्हाण, डॉ. भगवान केंद्रे, सौ. अलका मिलिंद पेकमवार, प्राचार्य सुधीर शिवणीकर यांसह अनेकांनी ब्लॅंकेटसाठी उदार देणगी दिली.

 

 

 

सुरेश शर्मा, जगतसिंह ठाकूर, कामाजी सरोदे, संतोष भारती, दिगंबर रूमने, रोहन यादव, भोला धुमाळ, जनार्धन वाकोडीकर, अंकित शर्मा, कपिल यादव, कैलास बरंडवाल, दत्ता पाटील, संगीता यादव यांनी उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.

 

 

 

गेल्या सात वर्षांपासून सातत्याने राबविलेल्या “मायेची ऊब” उपक्रमामुळे नांदेड शहरात थंडीमुळे निराधारांचा मृत्यू झाल्याची एकही घटना घडलेली नाही, ही या कार्याची मोठी कृतिशील कामगिरी मानली जाते.