काचिगुडा गव्हर्मेंट ज्युनिअर कॉलेजमध्ये मिड-डे मील लागू करावे – एमएलसी कविता

हैदराबाद प्रतिनिधी दि.१३ :-  राज्यातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक परिणामकारक व्हावे आणि उत्तीर्णतेचा टक्का वाढावा यासाठी गव्हर्मेंट ज्युनिअर कॉलेजमध्ये मिड-डे मील योजना तात्काळ अंमलात आणावी, अशी मागणी तेलंगणा जागृती अध्यक्षा व विधानपरिषदेच्या सदस्या कल्वकुंतला कविता यांनी केली.

 

‘जागृती जन-बाट’ कार्यक्रमाच्या भाग म्हणून कविता यांनी शुक्रवारी अंबरपेट मतदारसंघातील काचिगुडा येथील गव्हर्मेंट ज्युनिअर कॉलेजला भेट दिली. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत महाविद्यालयातील समस्या जाणून घेतल्या.

 

कविता म्हणाल्या,
“अध्यापक विद्यार्थी शिक्षणात मनापासून योगदान देत आहेत. मात्र, विद्यार्थ्यांना नियमित महाविद्यालयात आणण्यासाठी आणि उत्तीर्णतेचा टक्का वाढवण्यासाठी मिड-डे मील योजना अत्यावश्यक आहे. सरकारने ही योजना सुरू करावी. अन्यथा ‘जागृती’ संस्थेमार्फत आम्हीच मिड-डे मील सुरू करू.”
काचिगुडा गव्हर्मेंट ज्युनिअर कॉलेजला स्थापनेला सुमारे ६० वर्षे झाली असून, अद्याप मोठ्या दुरुस्तीचे काम झाले नाही. इमारतीला योग्य रंगसुद्धा देण्यात आलेला नाही, ही खेदाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

 

याच परिसरात
प्राथमिक शाळा,
प्राथमिक शाळेतील बालिकांचे वसतिगृह,
हायस्कूल
आणि गव्हर्मेंट ज्युनिअर कॉलेज अशी चारही शैक्षणिक संस्था एकाच संकुलात चालत असल्याने, नवीन व स्वतंत्र शैक्षणिक इमारती उभारण्याची गरज आहे, असे सूचनाही कविता यांनी राज्य सरकारला दिली.