देगलूर प्रतिनिधी दि.२४ :- अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता, नेतृत्वगुण आणि स्वावलंबनाची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने ‘आनंद नगरी’ फूड फेस्टिवलचे भव्य आयोजन करण्यात आले होते.
या फेस्टिवलला विद्यार्थी, प्राध्यापक, पालक तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.दरम्यान सकाळी १०:०० वाजता देगलूर महाविद्यालयात आनंदनगरी महोत्सवाचे उद्घाटन सहाय्यक शिक्षण उपसंचालक संजय पंचगल्ले यांच्या हस्ते करण्यात आले. या आनंदनगरी महोत्सवात पस्तीस विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी स्टाॅल लावले होते.
यामध्ये तब्बल पासष्ट हजार रुपयाचे खाद्य पदार्थ विक्री केले. यामध्ये गुलाबजामून, मटकी भेळ, जिलेबी, पावभाजी, आलू बिर्याणी, व्हेज पुलाव, पाणीपुरी, पापड, पपडी चाट, समोसा, कचोरी, मुरमुरा भेळ, पोहे चिवडा, मटकी, पेस्ट्री, लाडू, गुळपागुळ, मेंदूवडा, दही वडा, इडली, म्हैसूर भजे, खिचडी, मुरमुरा चिवडा, चन्ना मसाला, ब्रूस सलाट, केळी, अननस, कप केक आदीं पदार्थ विक्रीस ठेवण्यात आले होते.
या स्टाॅलवर खरेदी करण्यासाठी प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांची अक्षरशः झुंबड पडली ‘आनंद नगरी’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेने स्टॉल्स सजवून ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले.
या फूड फेस्टिवलचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची बीजे रोवणे, पाककलेचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देणे, नेतृत्वगुणांचा विकास करणे तसेच आर्थिक व्यवहारांची जाणीव निर्माण करणे होता. स्टॉल व्यवस्थापन, कच्चा माल खरेदी, दर निश्चिती, ग्राहकांशी संवाद, नफा-तोट्याचे गणित यामधून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळाला.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी ‘आनंद नगरी’ उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, असे उपक्रम विद्यार्थ्यांना स्वरोजगाराकडे प्रवृत्त करणारे, आत्मविश्वास वाढवणारे आणि व्यावहारिक ज्ञान देणारे ठरतात. विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून मिळालेला अनुभव भविष्यात नक्कीच उपयोगी पडेल, असा विश्वास व्यक्त केला.
एकूणच ‘आनंद नगरी’ फूड फेस्टिवलमुळे स्नेहसंमेलनात आनंद, चव, शिक्षण आणि उद्योजकतेचा संगम पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला.या आनंद नगरी उपक्रम यशस्वी करन्यासाठी प्राचार्य डॉ मोहन खताळ , उपप्राचार्य डॉ अनिल चिद्रावार,
कनिष्ठ महाविद्यालय उप प्राचार्य डॉ व्हि जी शेरीकर व डॉ पटेल एम एम यांचे मार्गदर्शन लाभले आनंद नगरी संयोजक प्रा संतोष विजय येरावार व समिती सदस्य प्रा संतोष वानोळे , प्रा तुकाराम लागले , प्रा ऐनलावार निकिता , प्रा रेणुका धाडे , प्रा अश्विनी बोडके , प्रा सुषमा पाटिल , प्रा प्रियंका पाटिल , प्रा दीपाली बाऱ्हाळे प्रा पोर्णिमा चैनपुरकर , प्रा द्रुपता जाधव , प्रा जवेरिया फातेमा प्रा अनिल बोडके , प्रा सतीश कुलकर्णी , श्री प्रशांत चौहान , श्री पांडुरंग जाधव व श्री मारोती सोनकांबळे यांनी परिश्रम घेतले.
