देगलूर महाविद्यालय स्नेहसंमेलनाचा समारोप.
देगलूर प्रतिनिधी दि.२६ :- अलीकडच्या काळामध्ये भारतीय समाज व्यवस्थेमध्ये पश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव वाढला आहे. पाश्चातिकरणाचे वाढते अनुकरण मोठ्या प्रमाणात वाढत चालल्यामुळे पारंपरिक कुटुंब व्यवस्था धोक्यात आल्याचे दिसून येत आहे. त्याचा विपरीत परिणाम म्हणजे भारतीय कौटुंबसंस्थेमध्ये घटस्फोटाच्या समस्येमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे.
याकरिता पाश्चातीकरणापासून दूर रहावे असे मत देगलूर महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य तथा कौटुंबिक समूपदेशक जिल्हा न्यायालय छत्रपती संभाजीनगरचे समुपदेशक डॉ.अशोक वाकोडकर यांनी व्यक्त केले.
ते देगलूर महाविद्यालयाच्या स्नेह संमेलनसमारोप प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेम्बरेकर होते.
व्यासपीठावर प्रमुख पाहुणे अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष जनार्धन चिद्रावार,सहसचिव राजकुमार महाजन, संस्थेच्या कार्यकारिणी मंडळाचे सदस्य सूर्यकांत नारलावार, देवेंद्र बालाजीराव मोतेवार चंद्रकांत नारलावार, गुरुराज, चिद्रावार, रविंद्र अप्पा द्याडे, विजय उनग्रतवार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ, उपस्थित होते.
प्रारंभी संगीत विभागाचे प्रा.गौतम भालेकर प्रा. सोमनाथ पवार व प्रकाश सोनकांबळे यानी स्वागत गीत गाऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ मोहन खताळ यांनी केले.ते स्नेहसंमेलनाच्या आयोजन; महाविद्यालयातील आजपर्यंतच्या विकासावर तसेच महाविद्यालयाच्या शैक्षणिक, क्रिडाविषयक संशोधनात्मक विकासावर प्रकाश टाकला.
डॉ वाकोडकर पुढे म्हणाले सध्याच्या काळात भारतात पाश्चात संस्कृतीचे वारे वाढत मोठ्या प्रमाणात वाहत आहेत. विभक्त कुटुंब पद्धती, मोबाईलचा वाढते प्रमाण अशा अनेक बाबी भारतीय संस्कृतीवर परिणामकारक असून यामुळे भारतात घटस्फोटाचे प्रमाण वाढत जात आहे .असे सांगून ते म्हणालेविद्यार्थ्यानी नेहमी सत्याची कास धरावी; जिद्द, आत्मनिर्भर निर्धार आत्मविश्वास ठेवूनच अभ्यास करावा. मला भविष्यात काय व्हायचे आहे ? हे ध्येय निश्चित करूनच मार्गक्रमण करावे.
महाविद्यालयातील स्नेहसंमेलनात क्रिडा ;साहित्य; नृत्य; एकांकिका; नाटक ;रांगोळी स्पर्धा ;प्रश्नमंजुषा; हस्ताक्षर; निबंध स्पर्धा आदि कलागुणांना वाव देणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.या स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना यावेळी मान्यवरांकडून बक्षीस वितरण करण्यात आले.
स्नेहसंमेलनात सांस्कृतिक चॅम्पियनशिप बारावी विज्ञान वर्गातील कु.प्रगती नर्सिंग कांबळे तर मनीष यादव बकरे रवीना रविकांत गवळी या दोन विद्यार्थ्यांना जनरल चॅम्पियनशिप प्राप्त झाले यांना यावेळी बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
शेला पागोटे कार्यक्रमानंतर स्नेहसंमेलनाची सांगता झाली कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा डॉ बा.रा.कत्तुरवार तर आभार प्रा. डॉ विनय भोगले यांनी मानले याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार , स्नेहसंमेलन प्रभारी प्रा डॉ संजय पाटील उपप्राचार्य एम एम पटेल , उपप्राचार्य डॉ.व्ही.जी. शेरीकर, पर्यवेक्षक संग्राम पाटील, कार्यालय अधीक्षक गोविंद जोशी, यांच्यासह सर्व प्राध्यापक व कर्मचारी व विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
