श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या सुशोभीकरणाची मागणी.

 

देगलूर प्रतिनिधी :देगलूर शहरातील एकमेव असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे सुशोभीकरण करून ते सुरळीत सुरू ठेवावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते धनाजी जोशी यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी देगलूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी निलम कांबळे यांची भेट घेऊन लेखी निवेदन दिले.

 

 

उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांना खेळण्यासाठी व कुटुंबीयांना विरंगुळ्यासाठी शहरात दुसरा पर्याय नसल्याने, उद्यानासाठी नवीन टेंडर काढून आधुनिक खेळ साहित्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावर मुख्याधिकारी निलम कांबळे यांनी हा विषय नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्याचे आश्वासन दिले.

 

 

 

दरम्यान, शहरातील लहान मुले व ज्येष्ठ नागरिकही उद्यान सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. “आम्हाला शिवाजी पार्कला कधी नेणार?” असा प्रश्न नातवंडांकडून विचारला जात असल्याने, उद्यान लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.