नायगावमध्ये भीम आर्मीचा सामाजिक उपक्रम; आंबेडकर जयंती स्थळ स्वच्छतेसाठी निवेदन.

 

नायगाव प्रतिनिधी:भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन सिंग यांच्या वाढदिवसानिमित्त नायगाव तालुका कमिटीच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नियोजित स्थळाची स्वच्छता व सुशोभीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी नगरपरिषद नायगाव येथे निवेदन सादर करण्यात आले.

 

 

निवेदनात जयंती स्थळाची तात्काळ साफसफाई, परिसरातील अडथळे दूर करणे, स्वच्छता राखण्यासाठी आवश्यक व्यवस्था करणे तसेच बंद असलेले लाईट सुरू करण्याची मागणी करण्यात आली. आगामी जयंती उत्सव स्वच्छ, सुरक्षित व सुशोभित वातावरणात पार पडावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

 

 

 

 

यावेळी तालुका अध्यक्ष नागेश भालके, शहर अध्यक्ष बुद्धभूषण सोनकांबळे, उपाध्यक्ष बलभीम हनुमंते, शेख असिफ, संदीप बालकोडे, मस्तान पटेल, साईनाथ गायकवाड, परमेश्वर वाघमारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत स्वच्छता व जनजागृतीचा सकारात्मक संदेश देण्यात आला.