मतदान केंद्रावर मतदान अधिकार्याची रवानगी.

देगलूर प्रतिनिधी दि. २९ : विधानसभा पोट निवडणूकीसाठी ३० ऑक्टोबर रोजी उद्या मतदान होत असून सदरील मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडन्यासाठी प्रशासनाच्या पुर्व तयारीनुसार देगलूर विधानसभा क्षेत्रातच्या निश्चित केलेल्या ३४६ मतदान केंद्रांवर

१ हजार ६३०  अधिकारी-कर्मचारी व ३४६ पेक्षा जास्त पोलिस कर्मचारी   यांची मतदान साहित्यासह ६५ बस व २५ जीप ने दि.२९ रोजी सकाळपासून रवानगी  करण्यात आली आहे.

मतदानासाठी प्रशासनामार्फत विविध साहित्याची जुळवाजुळव सुरु असून ईव्हीएम मशीन आदींसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं गेल आहे.  ज्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे तालुकास्तरीय कार्यालय ठेवण्यात आलेले आहे. त्या ठिकाणी मतमोजणी होणार असल्याने तेथे कर्मचाऱ्यांच्या साहित्य वितरित करण्यासाठी मंडप उभारण्यात आले आहे. याचबरोबरीने मतमोजणी करण्यासाठीही या ठिकाणी विशेष सुरक्षेसह कक्षाची तयारी केली जात आहे. प्रत्येक अधिकारी वर्गाला निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेली जबाबदारी या अनुषंगाने मतदानाची पूर्वतयारी सुरू करण्यात आली असून   या पार्श्वभूमीवर  राजकीय पक्षांच्या प्रचाराचा जोर ओसरला असला तरी या प्रचारावर नियंत्रण ठेवण्यासह निवडणूक आचारसंहिता प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यासाठी समिती नेमण्यात आलेली आहे. या समितीमार्फत विविध नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचारीवर्ग मार्फत छायाचित्रीकरण करणे, देखरेख ठेवणे,फिरती पथके अशी कामे विभागून देण्यात आलीआहेत.
देगलूर विधानसभा मतदारसंघात एकूण २ लाख ९८ हजार ८५३ मतदार आहेत. यामध्ये १ लाख ४४ हजार २५६ स्त्रिया तर १ लाख ५४ हजार ९२ पुरुष आणि ५ मतदार तृतिय पंथी यांचा समावेश आहे.  एकूण ३४६ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे त्यासाठी एकूण १ हजार ९७६ कर्मचारी नेमणूक करण्यात आली आहे तर ३४६ पोलीस कर्मचारी आणि ६२ बसेसची  व २५ जीप ची व्यवस्था करण्यात आली आहे तर २९ झोनल अधिकारी ,१२ भरारी पथक,एस एस टी २२पथक याची नेमणूक करण्यात आली आहे आणि सर्व मतदान केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आले असून ८ संवेदनशील मतदान केंद्र तर १५ प्रधानशील मतदान केंद्र आहेत   त्याचबरोबरीने कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता त्यादृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. प्रत्येक केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक मतदाराला हाताचे निर्जंतुकीकरण त्याचबरोबरीने तोंडाला मूखपट्टी लावणे असे जनजागृतीपर संदेशही प्रशासनामार्फत देण्यात आलेले आहेत. त्या दृष्टीने नागरिकांनीही मतदानाची नैतिक जबाबदारी पार पाडताना करोना संबंधातील उपाययोजना करणे आवश्यक असल्याचेही प्रशासनामार्फत सांगितले गेले आहे. सकाळी सात वाजेपासून मतदान प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. ही प्रक्रिया संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. ईव्हीएम मतदान यंत्रांची बिघाड होऊ नये यासाठी काळजी घेतली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *