नांदेड जिल्ह्यात आज सकाळी अनेक ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. उपलब्ध माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू यवतमाळ जिल्ह्यात होता व रिश्टर स्केलवर त्याची ४.४ इतकी नोंद झाली आहे. नागरिकांनी भयभीत होऊ नये किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आव्हान मा.ना.श्री अशोकराव चव्हाण यांनी ट्विटर द्वारे केले.