देगलूर प्रतिनिधी,दि.२८ :- नवीन शैक्षणिक धोरणाची आमलबजावनी जून २०२४ पासून महाराष्ट्र राज्यातील सर्व महाविद्यालयात केली जाणार असुन बदलत्या व संक्रमणशील काळात महाविद्यालयातील प्राध्यापकानी पारंपारिक राहून चालनार नाही तर आपली गुणवत्ता विकसीत करण्याचा स्वतःच प्रयत्न करणे आवश्यक आहे.
NAAC द्वारे महाविद्यालयाचे मूल्यांकन केलेजात असले तरी प्राध्यापकानी आपले ज्ञान अद्ययावत ठेऊन गुणवत्ता विकसीत केली पाहिजे, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातीदल भाषाशास्त्र संकुलातील प्रा. डॉ. दिलीप चव्हाण याँनी व्यक्त केले आहे.

ते अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयात आयोजित केलेल्या नवीन शैक्षणिक धोरण २०२० या विषयावर व्याख्यानात बोलत होते.
व्याख्यान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन ख़ताळ होते. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ अनिल चिद्रावार, उपप्राचार्य प्रा. ऊतमकुमार कांबळे पर्यवेक्षक प्रा संग्राम पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. माधव चोले तर आभार डॉ सर्जेराव रणखांब याँनी मानले.

